अ‍ॅपशहर

भारत युद्धासाठी केव्हाही तयार: हवाई दल

'भारताला कोणत्याही प्रकारचं युद्ध नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे. पण परिस्थितीच तशी निर्माण झाली आणि युद्धाला तोंड फुटले तर अगदी शॉर्ट नोटीसवरही आम्हीही युद्धासाठी तयार आहोत,' असं हवाई दल प्रमुख एस.बी. धनोवा यांनी ठणकावलं.

Maharashtra Times 8 Oct 2017, 2:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । गाजियाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम air chief marshal bs dhanoaoa says we remain ready to fight at short notice
भारत युद्धासाठी केव्हाही तयार: हवाई दल


'भारताला कोणत्याही प्रकारचं युद्ध नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे. पण परिस्थितीच तशी निर्माण झाली आणि युद्धाला तोंड फुटले तर अगदी शॉर्ट नोटीसवरही आम्हीही युद्धासाठी तयार आहोत,' असं हवाई दल प्रमुख एस.बी. धनोवा यांनी ठणकावलं.

भारतीय हवाई दलाचा आज ८५ वा स्थापना दिवस आहे. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गुरुवारी हवाई दलाचं विमान कोसळल्यानं ७ जवानांचा मृत्यू झाला होता. या जवानांना धनोवा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, पठाणकोटच्या हल्ल्यानंतर आपल्या सर्व हवाई तळांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यासही आम्ही तयार आहोत.'

हवाई दलात काही फायटर प्लेनचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या युद्धक्षमतेत वाढ झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, आज हवाई दलानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. हवाई दलाने आयोजित केलेल्या या परेडमध्ये सुखोई, तेजस, मिराज, मिग, लढाऊ विमान सी१७, सी १३० सारखे मालवाहू विमान आणि हेलिकॉप्टरचाही समावेश होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज