अ‍ॅपशहर

'मन की बात'मधून रेडिओने कमावले १० कोटी

रेडिओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम यशस्वी ठरताना दिसतोय. कारण, मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमातून ऑल इंडिया रेडिओने (AIR) गेल्या दोन वर्षांत तब्बल १० कोटी रुपये कमावले आहेत. लोकसभेत बुधवारी याबाबतची माहिती देण्यात आली.

Maharashtra Times 20 Jul 2017, 9:17 am
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम air earned rs 10 crore from mann ki baat in last 2 years
'मन की बात'मधून रेडिओने कमावले १० कोटी


रेडिओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम यशस्वी ठरताना दिसतोय. कारण, मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमातून ऑल इंडिया रेडिओने (AIR) गेल्या दोन वर्षांत तब्बल १० कोटी रुपये कमावले आहेत. लोकसभेत बुधवारी याबाबतची माहिती देण्यात आली.

केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ऑल इंडिया रेडिओला गेल्या दोन वर्षात झालेल्या नफ्याची आकडेवारी जाहीर केली. २०१६-१७ या वर्षात 'मन की बात'मधून ऑल इंडिया रेडिओने ५.१९ कोटींची कमाई केली, तर २०१५-१६ या वर्षात याच कार्यक्रमातून ४.७८ कोटी मिळाले होते.

'मन की बात' हा कार्यक्रम एकाच दिवशी १० भाषा आणि ३३ बोली भाषांमध्ये प्रसारित करण्यात येतो. 'ऑल इंडिया रेडिओ'ने मोदींचं भाषण इंग्रजी आणि संस्कृतमध्येही भाषांतरित केलं आहे. राठोड यांच्या माहितीनुसार देशातील जनता 'मन की बात' ऐकण्यासाठी ट्रान्समिटर्सचा वापर करते, तर परदेशातही मोदींचा कार्यक्रम ऐकणारा प्रेक्षकवर्ग आहे. परदेशातील नागरिक शॉर्टवेव्ह ट्रान्समिटर्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून 'मन की बात' ऐकतात, असं त्यांनी सांगितलं.

मोदींनी २०१४ साली ३ ऑक्टोबर रोजी देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी 'मन की बात' कार्यक्रम सुरु केला होता. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी रेडिओच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज