अमृतसर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी आणा, अशी मागणी अकाल तख्त प्रमुखांनी (जत्थेदार) केली आहे. आरएसएस ज्या प्रकारे देशात काम करत आहे, ते बघता देशात फूट पाडतील असं यातून स्पष्ट होत आहे, असं अकाल तख्तचं म्हणणं आहे.
अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी अमृतसरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. आरएसएस ज्या प्रकारे काम करत आहे, ते पाहता देशात फूट पाडतील असं वाटतं. त्यामुळे आरएसएसवर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजप स्वतः आरएसएसला मानतं, याबाबत सिंग यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता, जर असे असेल तर, ते देशासाठी चांगले नाही. देशाला हानी पोहोचवतील आणि देश उद्ध्वस्त करून टाकतील, असं सिंग म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंगसंबंधी मोठं विधान केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते, अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही, असे सांगतानाच लिंचिंग हा शब्द भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असे ते म्हणाले होते. इतकी विविधता असूनही लोक भारतात शांततेत राहतात आणि असे उदाहरण भारताशिवाय जगात कुठेही मिळत नाही, असंही त्यांनी सागितलं होतं.
लिंचिंग सारखे प्रकार भारतात होतच नाहीत: मोहन भागवत
भारतात मुस्लीम सर्वात सुखी: मोहन भागवत
मॉब लिंचिंगसारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना आपसी संघर्ष वाढवण्यात येत आहे, यापासून सतर्क राहण्याची गरज आहे, असं भागवत म्हणाले होते. अल्पसंख्यकांमध्ये भय निर्माण करण्यात येत असून एकमेकांमध्ये भेद निर्माण करून दुरी निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे काही विशिष्ट लोक आहेत. याचा प्रतिकार करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा आहे. पण त्याचा प्रामाणिकपणे आणि सक्तीने अंमल व्हायला हवा, असे आवाहन भागवत यांनी केले होते.
देशात काही ठिकाणी अच्याचाराच्या घटना घडतात असे नाही. मात्र त्या एका समुदायाने दुसऱ्या समुदायावर केल्या असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एखाद्या समुदायातील १०-५ लोकांनी कुणावर अत्याचार केले म्हणून त्या अत्याचाराला संपूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कायदा आपले काम करेल, ज्यांना शिक्षा करायची आहे त्यांना ती केली जाईल असेही भागवत म्हणाले होते.
अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी अमृतसरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. आरएसएस ज्या प्रकारे काम करत आहे, ते पाहता देशात फूट पाडतील असं वाटतं. त्यामुळे आरएसएसवर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजप स्वतः आरएसएसला मानतं, याबाबत सिंग यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता, जर असे असेल तर, ते देशासाठी चांगले नाही. देशाला हानी पोहोचवतील आणि देश उद्ध्वस्त करून टाकतील, असं सिंग म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंगसंबंधी मोठं विधान केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते, अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही, असे सांगतानाच लिंचिंग हा शब्द भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असे ते म्हणाले होते. इतकी विविधता असूनही लोक भारतात शांततेत राहतात आणि असे उदाहरण भारताशिवाय जगात कुठेही मिळत नाही, असंही त्यांनी सागितलं होतं.
लिंचिंग सारखे प्रकार भारतात होतच नाहीत: मोहन भागवत
भारतात मुस्लीम सर्वात सुखी: मोहन भागवत
मॉब लिंचिंगसारखे शब्द वापरून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. विशिष्ट समुदायाप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात येत असताना आपसी संघर्ष वाढवण्यात येत आहे, यापासून सतर्क राहण्याची गरज आहे, असं भागवत म्हणाले होते. अल्पसंख्यकांमध्ये भय निर्माण करण्यात येत असून एकमेकांमध्ये भेद निर्माण करून दुरी निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे काही विशिष्ट लोक आहेत. याचा प्रतिकार करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा आहे. पण त्याचा प्रामाणिकपणे आणि सक्तीने अंमल व्हायला हवा, असे आवाहन भागवत यांनी केले होते.
देशात काही ठिकाणी अच्याचाराच्या घटना घडतात असे नाही. मात्र त्या एका समुदायाने दुसऱ्या समुदायावर केल्या असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एखाद्या समुदायातील १०-५ लोकांनी कुणावर अत्याचार केले म्हणून त्या अत्याचाराला संपूर्ण समुदायाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. कायदा आपले काम करेल, ज्यांना शिक्षा करायची आहे त्यांना ती केली जाईल असेही भागवत म्हणाले होते.