नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्रामध्ये गंभीर त्रुटी असल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवला आहे. ‘आकाश’चा अपयशाचा दर ३० टक्के असल्याचे शुक्रवारी लोकसभेमध्ये मांडलेल्या अहवालामध्ये ‘कॅग’ने नमूद केले आहे.
सन २०१३ ते २०१५ या कालावधीत चीनच्या सीमेवर सहा ठिकाणी ही जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. या कंपनीकडून ही क्षेपणास्त्रे ३,६१९ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१४पर्यंत मिळालेल्या ८० क्षेपणास्त्रांपैकी २० क्षेपणास्त्रांची एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत चाचणी घेण्यात आली. मात्र त्यातील सहा क्षेपणास्त्रे ३० टक्के अपयशी ठरली, असे कॅगने म्हटले आहे.
सन २०१३ ते २०१५ या कालावधीत चीनच्या सीमेवर सहा ठिकाणी ही जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. या कंपनीकडून ही क्षेपणास्त्रे ३,६१९ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१४पर्यंत मिळालेल्या ८० क्षेपणास्त्रांपैकी २० क्षेपणास्त्रांची एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत चाचणी घेण्यात आली. मात्र त्यातील सहा क्षेपणास्त्रे ३० टक्के अपयशी ठरली, असे कॅगने म्हटले आहे.