नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील रोड शोपूर्वी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट करत भारतीय जनता पक्षाचे नामकरण करत ते... भागती जनता पक्ष... असे ठेवले आहे. नामकरण करताना अखिलेश यादव यांनी, पंतप्रधान पत्रकार परिषदा टाळतात, तर भाजप नेते प्रश्नांपासून दूर पळतात अशा शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
'भाजपच्या डोक्यात कचरा'
या टीकेपूर्वी अखिलेश यांनी पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाद्वारे पैसा गोळा करण्याचा आरोप करच देशाला 'प्रचारमंत्र्याची' नाही, 'प्रधानमंत्र्याची' गरज असल्याचे म्हटले होते. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी झाडू मारण्याच्या नावाखाली कोण जाणे किती पैसा गोळा केला असेल, असेही ते हरदोई येथील एका सभेत म्हणाले. भाजपवर टीका करताना अखिलेश या सभेत पुढे म्हणतात, 'सुरुवातीच्या काळात ते (भाजपचे लोक) झाडू घेऊन फिरत होते हे तुम्हाला आठवत आहे की नाही?. देशाच्या पंतप्रधानांनी झाडू घेतला आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील झाडू घेतला. मग मला सांगा कचरा संपला का?. कुठे आहे कचरा?, कचरा तर भाजपच्या डोक्यात आहे. यांचा विषय शौचालयापासून सुरू होत तो शौचालयावरच संपतो'
'देश जवानांमुळे सुरक्षित, भाजपमुळे नाही'
उत्तर प्रदेशच्या सीमाही असुरक्षित झाल्या आहेत. एकाच्या बदल्यात आपल्या शत्रू राष्ट्राच्या १० सैनिकांचे शिर घेऊन येण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदींनी सीमेवर सर्वाधिक जवानांना शहीद केले, अशी टीकाही अखिलेश यांनी पंतप्रधानांवर केली. भाजप दावा करते की, आमच्या सीमा सुरक्षित आहेत. मात्र, त्या सुरक्षित आहेत जवानांमुळे, भाजपमुळे नाही, असा टोलाही अखिलेश यांनी लागावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील रोड शोपूर्वी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट करत भारतीय जनता पक्षाचे नामकरण करत ते... भागती जनता पक्ष... असे ठेवले आहे. नामकरण करताना अखिलेश यादव यांनी, पंतप्रधान पत्रकार परिषदा टाळतात, तर भाजप नेते प्रश्नांपासून दूर पळतात अशा शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
'भाजपच्या डोक्यात कचरा'
या टीकेपूर्वी अखिलेश यांनी पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाद्वारे पैसा गोळा करण्याचा आरोप करच देशाला 'प्रचारमंत्र्याची' नाही, 'प्रधानमंत्र्याची' गरज असल्याचे म्हटले होते. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी झाडू मारण्याच्या नावाखाली कोण जाणे किती पैसा गोळा केला असेल, असेही ते हरदोई येथील एका सभेत म्हणाले. भाजपवर टीका करताना अखिलेश या सभेत पुढे म्हणतात, 'सुरुवातीच्या काळात ते (भाजपचे लोक) झाडू घेऊन फिरत होते हे तुम्हाला आठवत आहे की नाही?. देशाच्या पंतप्रधानांनी झाडू घेतला आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील झाडू घेतला. मग मला सांगा कचरा संपला का?. कुठे आहे कचरा?, कचरा तर भाजपच्या डोक्यात आहे. यांचा विषय शौचालयापासून सुरू होत तो शौचालयावरच संपतो'
'देश जवानांमुळे सुरक्षित, भाजपमुळे नाही'
उत्तर प्रदेशच्या सीमाही असुरक्षित झाल्या आहेत. एकाच्या बदल्यात आपल्या शत्रू राष्ट्राच्या १० सैनिकांचे शिर घेऊन येण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदींनी सीमेवर सर्वाधिक जवानांना शहीद केले, अशी टीकाही अखिलेश यांनी पंतप्रधानांवर केली. भाजप दावा करते की, आमच्या सीमा सुरक्षित आहेत. मात्र, त्या सुरक्षित आहेत जवानांमुळे, भाजपमुळे नाही, असा टोलाही अखिलेश यांनी लागावला.