श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रातील मोदी सरकारने ३८ हजार अतिरिक्त जवानांना तैनात केले असून पर्यटकांनाही सोमवारपर्यंत जम्मू-काश्मीर सोडून जाण्यास सांगितल्याने काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संविधानातील कलम ३५ अ आणि कलम ३७० रद्द करण्यासाठीच मोदी सरकारने हालचाल सुरू केल्याचा विरोधकांचा संशय बळावला असून या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॕशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांच्या घरी विरोधकांची बैठक सुरू आहे. या बैठकीला पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती आणि कांग्रेस नेतेही उपस्थिति असून यावेळी पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.
श्रीनगर येथील अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. नॕशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, शाह फैसल, सज्जाद लोन तसेच काँग्रेस नेतेही या ऑल पार्टी मिटिंगला उपस्थित आहेत.
या बैठकीत काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याबद्दल आणि ३५ अ बाबत चर्चा करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने कलम ३५ अ बाबतचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करण्यासाठीच्या रणनीतीवरही चर्चा करण्सात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शहांचीही बैठक
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आज काश्मीरप्रश्नी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सचिव अजित डोवाल आणि गृह सचिव राजीव गौबा उपस्थित होते. ही मिटिंग संपल्याबरोबर जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश कुमार यांच्याशीही शहा यांनी चर्चा केल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
श्रीनगर येथील अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. नॕशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, शाह फैसल, सज्जाद लोन तसेच काँग्रेस नेतेही या ऑल पार्टी मिटिंगला उपस्थित आहेत.
या बैठकीत काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याबद्दल आणि ३५ अ बाबत चर्चा करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारने कलम ३५ अ बाबतचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करण्यासाठीच्या रणनीतीवरही चर्चा करण्सात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शहांचीही बैठक
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आज काश्मीरप्रश्नी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सचिव अजित डोवाल आणि गृह सचिव राजीव गौबा उपस्थित होते. ही मिटिंग संपल्याबरोबर जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश कुमार यांच्याशीही शहा यांनी चर्चा केल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.