मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
आपल्या मोबाइलचं सिम कार्ड तुम्ही आधार कार्डशी लिंक केलंत का?... त्याबाबत तुम्हाला कंपनीकडून मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, फेब्रुवारी २०१८ पर्यंत सिम आणि आधार एकमेकांशी जोडलं न गेल्यास, त्याचं व्हेरिफिकेशन न झाल्यास सिम कार्ड बंद होणार आहे.
खोटी कागदपत्रं देऊन सिम कार्ड घ्यायचं आणि ते गुन्ह्यांसाठी वापरून नंतर फेकून द्यायचं, असे अनेक प्रकार आपल्याकडे घडले आहेत. अनेक दहशतवाद्यांनीही अशा पद्धतीने सिम कार्ड वापरल्याची उदाहरणं आहेत. या प्रकरणी लोकनीती फाउंडेशनने केलेल्या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी माजी सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
All SIM cards have to be verified with Aadhaar within a year from date of judgement. All un-linked phones will be deactivated after Feb'18. — ANI (@ANI) September 9, 2017
त्यानुसारच, देशातील १०० कोटींहून अधिक मोबाइल ग्राहकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी सिम कार्ड आधार कार्डशी जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. म्हणजेच, फेब्रुवारी २०१८ पर्यंत जे सिम-आधार लिंक करणार नाहीत, ते नंबर बंद केले जाणार आहेत.
दरम्यान, मार्च-एप्रिल महिन्यापासून आधार कार्ड नसेल तर नवं सिम कार्ड दिलंच जात नाहीए. तशी सूचनाच ट्रायनं केली होती. डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ होत असतानाच, आधार-सिम व्हेरिफिकेशन ग्राहकहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आपल्या मोबाइलचं सिम कार्ड तुम्ही आधार कार्डशी लिंक केलंत का?... त्याबाबत तुम्हाला कंपनीकडून मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, फेब्रुवारी २०१८ पर्यंत सिम आणि आधार एकमेकांशी जोडलं न गेल्यास, त्याचं व्हेरिफिकेशन न झाल्यास सिम कार्ड बंद होणार आहे.
खोटी कागदपत्रं देऊन सिम कार्ड घ्यायचं आणि ते गुन्ह्यांसाठी वापरून नंतर फेकून द्यायचं, असे अनेक प्रकार आपल्याकडे घडले आहेत. अनेक दहशतवाद्यांनीही अशा पद्धतीने सिम कार्ड वापरल्याची उदाहरणं आहेत. या प्रकरणी लोकनीती फाउंडेशनने केलेल्या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी माजी सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
All SIM cards have to be verified with Aadhaar within a year from date of judgement. All un-linked phones will be deactivated after Feb'18. — ANI (@ANI) September 9, 2017
त्यानुसारच, देशातील १०० कोटींहून अधिक मोबाइल ग्राहकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी सिम कार्ड आधार कार्डशी जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली. म्हणजेच, फेब्रुवारी २०१८ पर्यंत जे सिम-आधार लिंक करणार नाहीत, ते नंबर बंद केले जाणार आहेत.
दरम्यान, मार्च-एप्रिल महिन्यापासून आधार कार्ड नसेल तर नवं सिम कार्ड दिलंच जात नाहीए. तशी सूचनाच ट्रायनं केली होती. डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ होत असतानाच, आधार-सिम व्हेरिफिकेशन ग्राहकहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.