अ‍ॅपशहर

‘हत्या रोखण्यासाठी मनुष्यबळ अपुरे’

राजस्थानातील अलवर जिल्ह्यात कथित गोरक्षकांकडून झालेल्या उमर खान याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना ‘प्रत्येक घटना वेळीच रोखण्यासाठी राज्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही,’ असे सांगत राज्याचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी आपली हताशा व्यक्त केली.

Maharashtra Times 14 Nov 2017, 2:00 am
वृत्तसंस्था, जयपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alwar cow vigilantism rajasthan minister gulab chand kataria says
‘हत्या रोखण्यासाठी मनुष्यबळ अपुरे’


राजस्थानातील अलवर जिल्ह्यात कथित गोरक्षकांकडून झालेल्या उमर खान याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना ‘प्रत्येक घटना वेळीच रोखण्यासाठी राज्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही,’ असे सांगत राज्याचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी आपली हताशा व्यक्त केली.

उमर खान याचा मृतदेह शनिवारी रामगड येथे रेल्वे रुळांवर सापडला होता. मात्र खान हा आपल्या वाहनातून गायी घेऊन येत असताना गोरक्षकांनी त्याची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप त्याचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, पुरावे नष्ट करणे हे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. उमर खान याच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात या प्रकरणासाठी नेमलेल्या वैद्यकीय बोर्डाकडून केले जाणार आहे. अलवर जिल्ह्यातच काही महिन्यांपूर्वी पहलू खान या डेअरी व्यावसायिकाची हत्या झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज