अ‍ॅपशहर

बसचालकाने असे वाचवले ५० यात्रेकरूंचे प्राण

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५० यात्रेकरूंचे प्राण वाचले आहेत. ते वाचवण्यात या बसच्या चालकाचं योगदान मोठं आहे. दहशतवादी अंधारात अंदाधुंद गोळीबार करत असताना या जिगरबाज चालकानं जराही विचलित न होता, धीराने बस चालवणं सुरुच ठेवलं आणि एका सुरक्षित जागी नेल्यावरच त्यानं ती थांबवली. याचं नाव आहे सलीम.

Maharashtra Times 11 Jul 2017, 3:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amarnath yatra terror attack bus driver saleem saved the lives of 50 yatris
बसचालकाने असे वाचवले ५० यात्रेकरूंचे प्राण


अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५० यात्रेकरूंचे प्राण वाचले आहेत. ते वाचवण्यात या बसच्या चालकाचं योगदान मोठं आहे. दहशतवादी अंधारात अंदाधुंद गोळीबार करत असताना या जिगरबाज चालकानं जराही विचलित न होता, धीराने बस चालवणं सुरुच ठेवलं आणि एका सुरक्षित जागी नेल्यावरच त्यानं ती थांबवली. याचं नाव आहे सलीम.

सलीमच्या चुलत भावानं, जावेद मिर्झा यांनी या भयानक घटनेचं वर्णन केलं. ते म्हणाले, 'सलीमचा मला सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास फोन आला. फोनवर त्याने हल्ल्याची माहिती दिली. तो मला म्हणाला की त्यानं गोळीबार सुरू असतानाही बस थांबवली नाही. त्याला ७ जणांचे प्राण वाचवता आले नाहीत, पण ५० जणांना त्यानं सुरक्षित ठिकाणी नेलं. मला त्याचा अभिमान आहे.'

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीदेखील सलीमचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, 'दहशतवादी गोळ्या झाडत असतानादेखील बस चालकाने धैर्य दाखवून प्रवाशांचे प्राण वाचवले. आम्ही त्याच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी करणार आहोत.'

काश्मीरच्या अनंतनागमध्ये बेंटेगू आणि खानबल भागात अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी काल (सोमवारी) हल्ला केला. या हल्ल्याआधी सायंकाळी ८.२० च्या सुमारास दहशतवाद्यांनी दोन पोलीस तळांना लक्ष्य केलं होतं. ही GJ ०९ Z ९९७६ क्रमांकाची बस गुजरातच्या साबरकांता जिल्ह्यातली आहे. या बसने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले होते. पोलीस ताफ्याशिवायच ही बस यात्रेकरूंना घेऊन निघाली होती, अशी माहिती केंद्रीय राखीव सुरक्षा बलाने (CRPF) दिली. अमरनाथ यात्रेकरूंच्या ताफ्याचं सुरक्षा कवच सायंकाळी ७ नंतर काढण्यात येतं आणि या वेळेत प्रवासी बसेसना महामार्गावर येण्यासही मज्जाव आहे. या बसने सुरक्षेसंबंधी दुसरा नियम मोडला तो म्हणजे अमरनाथ देवस्थान बोर्डात या बसची नोंदणीच करण्यात आलेली नव्हती. या बसमधील यात्रेकरुंनी दोन दिवसांपूर्वी यात्रा संपवली होती आणि ते परतीच्या मार्गावर होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज