अ‍ॅपशहर

'कसाब'ने रोखला UPचा विकास: अमित शहा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे एका जाहीर सभेत बोलताना उत्तर प्रदेशमधील भाजप विरोधकांची तुलना मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी 'कसाब'च्या नावाशी केली. 'कसाब'मुळेच उत्तर प्रदेशचा विकास अडला आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. दरम्यान, शहा यांच्या विधानावर काँग्रेसने तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.

Maharashtra Times 22 Feb 2017, 7:45 pm
मटा ऑनलाइन वृत्त । आझमगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amit shah asks people of uttar pradesh to get rid of kasab
'कसाब'ने रोखला UPचा विकास: अमित शहा


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे एका जाहीर सभेत बोलताना उत्तर प्रदेशमधील भाजप विरोधकांची तुलना मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी 'कसाब'च्या नावाशी केली. 'कसाब'मुळेच उत्तर प्रदेशचा विकास अडला आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. दरम्यान, शहा यांच्या विधानावर काँग्रेसने तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.

उत्तर प्रदेशला 'कसाब' नावाचा आजार झाला आहे, असे सांगत अमित शहा यांनी यावेळी 'कसाब' या उल्लेखाचा फोडही करून सांगितला. 'क' म्हणजे काँग्रेस, 'स' म्हणजे समाजवादी पार्टी आणि 'ब' म्हणजे बहुजन समाज पक्ष. या तिघांनीच उत्तर प्रदेशची पीछेहाट केली असून या 'कसाब'ला उत्तर प्रदेशमधून बाहेर काढा, असं आवाहनच त्यांनी मतदारांना केलं.

दरम्यान, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी शहा यांच्या विधानावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. भाजपने पुन्हा एकदा आपला जातीयवादी चेहरा दाखवला आहे. शहा यांचं विधान त्याचंच द्योतक आहे, असा आरोप सिंघवी यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज