अ‍ॅपशहर

amit shah : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवारांच्या भेटीवर अमित शहांचं सूचक वक्तव्य

महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप येण्याची चिन्ह आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आहे. पण अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं, पोलीस अधिकरी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून जोरदार राजकारण रंगलं आहे. आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2021, 4:34 pm
नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar ) आणि नेते प्रफुल्ल पटेल ( praful patel ) यांनी गृहमंत्री अमित शहा ( amit shah ) यांची अहमदाबादमध्ये भेट घेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. आता यासंबंधी खुद्द अमित शहा यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अमित शहा यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amit shah - sharad pawar
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शरद पवारांच्या भेटीवर अमित शहांचं सूचक वक्तव्य


अमित शहा यांना पत्रकारांनी शरद पवार यांच्या भेटी बाबत प्रश्न विचारला. सर्वकाही जाहीर करण्यासारखं नसतं, असं सूचक वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे. अमित शहांचं वक्तव्य हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर शिक्कमोर्तब करणारं असल्याचं चर्चा आहे. यामुळे महाराष्ट्रात आता राजकीय भूकंप येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी अहमदाबादला गेले होते. अहमदाबादमध्ये त्यांची भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. एका गुजराती वृत्तपत्राने ही बातमी दिली. त्यावरून अमित शहा यांना आज दिल्ली प्रश्न केला गेला. सर्वकाही जाहीरपणे सांगायचं नसतं, असं अमित शहा म्हणाले आहेत. या आधी शरद पवार, प्रफुल्ल पेटल आणि अमित शहा यांची भेट झालीच नसल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. सोशल मीडियात सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं मलिक म्हणाले होते.

... म्हणून सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली, राहुल गांधींचा आरोप

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांविरोधात १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. या प्रकरणी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. तसंच परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टातही दाखल केली आहे. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी 'सामना'मधून अनिल देशमुखांवर टीकेचे बाण सोडले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे खंडणी वसुली करत होता हे अनिल देशमुखांना माहिती नव्हते? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे.

Amit Shah : 'लँड जिहाद'... आसाममध्ये 'लव्ह जिहाद'सोबत भाजपचा नवा शब्दप्रयोग!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज