अ‍ॅपशहर

amit shah : अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, 'नैतिकतेचा प्रश्न, विचार करायला हवा'

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात गाजत असलेल्या सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या पत्र प्रकरणावरून अमित शहांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Mar 2021, 8:43 am
मेदिनीपूर, पश्चिम बंगालः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा ( amit shah ) यांनी महाराष्ट्र पोलिसातील वसुली प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना आपण कुठलाही सल्ला देणार नाही. पण हा नैतिकतेचा प्रश्न आहे आणि त्यांनी विचार केला पाहिजे, असं अमित शहा म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amit shah - uddhav thackeray
अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, 'नैतिकतेचा प्रश्न, विचार करायला हवा'


महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री देशमुख यांनी महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट पोलिसांना दिले, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. 'हा प्रश्न फक्त पोलीस आयुक्तांचा नाही. तर इतर निरीक्षकांनीही केंद्र सरकारला पत्र लिहिली आहेत. पण मी सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे', असं अमित शहा म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी जो अहवाल दिला आहे तो आपण आरामात बघू. पण हा नैतिकतेचा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र सरकारने आपली नैतिकता दाखवली पाहिजे, असं शहा म्हणाले.

sharad pawar : 'असं काय आहे ज्यामुळे शरद पवार अनिल देशमुखांचा बचाव करत आहेत?'

अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदावरून हटवण्याच्या प्रश्नावरही शहांनी उत्तर दिलं. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुठलाही सल्ला देणार नाही. पण हा प्रश्न नैतिकतेचा आहे. त्यांनी विचार केला पाहिजे, असं शहा म्हणाले. शरद पवारांना काही सल्ला देणार का? असं विचारल्यावर शहांनी नकार दिला. अमित शहा यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला यासंदर्भात मुलाखत दिली.

devendra fadnavis : फडणवीसांनी केंद्रीय गृह सचिवांना दिले पुरावे; म्हणाले, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...'

दरम्यान, महाराष्ट्रातील आयपीएस आणि नॉन आयपीएस पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. त्यांना पुरावेही दिले. तसंच या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही फडणवीस यांनी केली आहे. तर या प्रकरणाची योग्य दखल घेऊन सरकार नक्कीच कारवाई करेल, असं आश्वासन केंद्रीय गृह सचिवांनी फडणवीस यांना दिलं आहे.

sanjay raut : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी: संजय राऊत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज