अ‍ॅपशहर

coronavirus india : 'काँग्रेस शासित राज्यांत लसींचा काळाबाजार अन् कचऱ्याच्या डब्यात डोस'

देशात करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये लसींचा अपेक्षित साठा नसल्याने लसीकरण केंद्र बंद आहेत. पण लसीकरणावरून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jun 2021, 7:29 pm
नवी दिल्लीः करोनावरील लसीकरणावरून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल ( anurag thakur targets congress ) केला आहे. अनुराग ठाकूर यांनी ट्वीट केले आहेत. काँग्रेस शासित पंजाब आणि राजस्थानमध्ये राज्य सरकारांनी करोनावरील लसीचा अपव्यय ( vaccine wastage ) केला. तसंच लसींचा काळाबाजारही ( vaccine black marketing ) केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. गांधी घराण्याच्या पसंतीचे दोन्ही मुख्यमंत्री या 'भ्रष्टाचारा'च्या मागे आहेत. जी लस नागरिकांना मोफत दिली गेली पाहिजे, तिथे काँग्रेस शासित राज्यांमध्ये ३१२० रुपयांना दिली जात आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anurag thakur - covid vaccine
'काँग्रेस शासित राज्यांत लसींचा काळाबाजार अन् कचऱ्याच्या डब्यात'


काँग्रेस शासित राज्यात कुठे काळाबाजार सुरू आहे. तर कुठे लस कचऱ्यात फेकली जात आहे. हे करणारे कोण आहेत? ते आहेत गांधी घराण्याचे खास मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि अशोक गहलोत. करोनावरील एक डोस राज्यांना ४०० रुपयांना मिळते. पण पंजाब सरकार मात्र ही लस खासगी हॉस्पिटल्सना चढ्या दराने विकत आहे, असा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला.

केंद्र सरकार लस उत्पादकांकडून डोस खरेदी करून राज्यांना ती ४०० रुपये प्रति डोसने देत आहे. पंजाब सरकार तेच डोस खासगी हॉस्पिटल्सना विकत आहे. १०६० रुपये प्रति डोस दराने ही लस विकली जात आहे. तर खासगी हॉस्पिटल्स हे डोस १५६० रुपयांना नागरिकांना देत आहेत. म्हणजे जी लस नागरिकांना मोफत मिळणार आहे तिथे काँग्रेसच्या राज्यात ३१२० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. हे काँग्रेसचे नेहमीचे वन टू का फोरचे धोरण राहिले आहे, असं अशी टीका ठाकूर यांनी ट्वीटमधून केली आहे.

'गौतम गंभीर फाऊंडेशन' औषधांच्या अवैध साठेबाजी प्रकरणात दोषी : ड्रग्ज कंट्रोलर

राजस्थानमध्ये कचऱ्याच्या डब्यात लस फेकली जात आहे. राजस्थानमधील गहलोत सरकार तर पंजाब सरकारच्याही पुढे आहे. राजस्थानमध्ये आधी ११.५० लाख लसीचे डोस वाया गेले. आता राज्यातील १० जिल्ह्यांमधील ३५ लसीकरण केंद्रांवरील कचऱ्याच्या डब्यात लसीचे शेकडो डोस फेकलेले दिसून आले. काँग्रेसने कचऱ्याच्या डब्यात लस नाही तर जनतेचा विश्वास, गरजूंची आपेक्षा आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांची श्वास फेकला आहे. हा विश्वासघात आहे आणि जनता माफ करणार नाही, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

rahul gandhi : राहुल गांधींनी ट्वीटरवर अनेक काँग्रेस नेत्यांना केले अनफॉलो; पक्षात तरुण - ज्येष्ठ नेत्यांमध्ये संघ

Covid19: 'बायोलॉजिकल ई'च्या 'मेड इन इंडिया' लशीची केंद्राकडून आगाऊ खरेदी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज