अटारी सीमा, पंजाब
भारताचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना भारताच्या हवाली करतानाही पाकिस्तानने खोडसाळपणा केला आहे. अभिनंदन यांना दुपारी चार वाजेपर्यंत भारताच्या हवाली करण्यात येईल, असं पाककडून सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात पाकने कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्यात दिरंगाई केली. पाकिस्तानने दोन वेळा अभिनंदन यांना हवाली करण्याची वेळ बदलवली. या सर्व घडामोडींवर संरक्षणमंत्री बारकाईने नजर ठेवून आहेत. रात्री उशिरापर्यंत पाकने तात्कळत ठेवल्याने भारतीयांचा सर्वांचा संताप झाला. शेवटची अपडेट हाती आली तेव्हा पाक अभिनंदन यांना रात्री नऊ वाजता भारताकडे सोपवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अभिनंदन वर्तमान यांना वाघा सीमेवर आणण्यात आलंय. बिटींग रिट्रीट सोहळ्यानंतर त्यांना भारताच्या हवाली करण्यात येईल, असं पाकिस्तानच्या मीडियातून सांगण्यात आलं. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताच्या प्रशासनाने आणि लष्कराकडून अभिनंदन यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली. हवाई दलाचे उच्च अधिकारी आणि अभिनंदन यांचे आई-वडीलही अटारी सीमेवर दाखल झाले. आता अभिनंदन मायभूमीत कधी दाखल होणार याची सर्वांना उत्सुकता होती. अभिनंदन दुपारी चार वाजता येईल म्हणता म्हणता रात्रीचे नऊ वाजले तरी पाकिस्तानने त्यांना भारताच्या हवाली केली नाही. तर मीडियातील काही रिपोर्टनुसार अभिनंदन अद्यापही लाहोरमध्येच आहेत. त्यांना वाघा सीमेवर आणलेलचं नाही. कागदपत्रांची पूर्ततेसाठी ते लाहोरमध्येच अडकून आहेत, असं बोललं जातंय. यामुळे पाकिस्तानचा खोडसाळपणा समोर आला आहे.
भारताचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना भारताच्या हवाली करतानाही पाकिस्तानने खोडसाळपणा केला आहे. अभिनंदन यांना दुपारी चार वाजेपर्यंत भारताच्या हवाली करण्यात येईल, असं पाककडून सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात पाकने कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्यात दिरंगाई केली. पाकिस्तानने दोन वेळा अभिनंदन यांना हवाली करण्याची वेळ बदलवली. या सर्व घडामोडींवर संरक्षणमंत्री बारकाईने नजर ठेवून आहेत. रात्री उशिरापर्यंत पाकने तात्कळत ठेवल्याने भारतीयांचा सर्वांचा संताप झाला. शेवटची अपडेट हाती आली तेव्हा पाक अभिनंदन यांना रात्री नऊ वाजता भारताकडे सोपवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अभिनंदन वर्तमान यांना वाघा सीमेवर आणण्यात आलंय. बिटींग रिट्रीट सोहळ्यानंतर त्यांना भारताच्या हवाली करण्यात येईल, असं पाकिस्तानच्या मीडियातून सांगण्यात आलं. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताच्या प्रशासनाने आणि लष्कराकडून अभिनंदन यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली. हवाई दलाचे उच्च अधिकारी आणि अभिनंदन यांचे आई-वडीलही अटारी सीमेवर दाखल झाले. आता अभिनंदन मायभूमीत कधी दाखल होणार याची सर्वांना उत्सुकता होती. अभिनंदन दुपारी चार वाजता येईल म्हणता म्हणता रात्रीचे नऊ वाजले तरी पाकिस्तानने त्यांना भारताच्या हवाली केली नाही. तर मीडियातील काही रिपोर्टनुसार अभिनंदन अद्यापही लाहोरमध्येच आहेत. त्यांना वाघा सीमेवर आणलेलचं नाही. कागदपत्रांची पूर्ततेसाठी ते लाहोरमध्येच अडकून आहेत, असं बोललं जातंय. यामुळे पाकिस्तानचा खोडसाळपणा समोर आला आहे.