बेंगळुरू: भारतीय जनता पक्षासाठी भारतात ज्या वस्तूंचे उत्पादन होते ते सर्व लोकल आहे. यात भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांचाही समावेश आहे, असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर बना या आवाहनाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे प्रवक्ता जीव्हीएल नरसिंह राव यांनी हे स्पष्ट केले आहे. लोकल उत्पादने खरेदी करण्याबाबत कोणत्याही गाइडलाइन्स देण्यात येणार नाहीत, मात्र देशात उत्पादित चांगल्या दर्जाच्या वस्तू घेतल्या पाहिजेत असे लोकांना भासेल असे वाटते असेही ते पुढे म्हणाले.
समजा एखादा शॅम्पू देशात तयार झाला असेल आणि तो उत्पादन करणारी कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी असली, तरी देखील हे उत्पादन लोकलच मानण्यात येईल, असे पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राव म्हणाले. लोकल याचा अर्थ भारतात केवळ भारतीय कंपन्यांनी उत्पादित केलेला माल असा असा होत नाही, तर जे जे भारतात तयार झालेले असेल, ते ते सर्व लोकल असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतात तयार झालेल्या विविध कंपन्यांच्या वस्तूंमध्ये फरक करता येणार नाही. मात्र, हे खरेदी करा आणि हे करू नका, असे सरकार लोकांना सांगणार नाही. काय खरेदी करावे हा त्या-त्या व्यक्तीचा अधिकार आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले आहे.
कोविड-१९ सारख्या संकट काळात भारताने आपल्या गरजा पूर्ण करण्याबाबत उत्तम व्यवस्थापन केले आहे. मात्र, त्याच वेळी जगातील इतर देश दुसऱ्या देशांवर अवलंबून असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. भारताने जगातील १०० देशांची औषधाची गरज भागवली आहे. तसेच भारताने १० लाख एन-९५ मास्कचे उत्पादन केले आहे. इतके मोठे उत्पादन यापूर्वी भारतात झालेले नव्हते, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर बना या आवाहनाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे प्रवक्ता जीव्हीएल नरसिंह राव यांनी हे स्पष्ट केले आहे. लोकल उत्पादने खरेदी करण्याबाबत कोणत्याही गाइडलाइन्स देण्यात येणार नाहीत, मात्र देशात उत्पादित चांगल्या दर्जाच्या वस्तू घेतल्या पाहिजेत असे लोकांना भासेल असे वाटते असेही ते पुढे म्हणाले.
समजा एखादा शॅम्पू देशात तयार झाला असेल आणि तो उत्पादन करणारी कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी असली, तरी देखील हे उत्पादन लोकलच मानण्यात येईल, असे पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राव म्हणाले. लोकल याचा अर्थ भारतात केवळ भारतीय कंपन्यांनी उत्पादित केलेला माल असा असा होत नाही, तर जे जे भारतात तयार झालेले असेल, ते ते सर्व लोकल असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतात तयार झालेल्या विविध कंपन्यांच्या वस्तूंमध्ये फरक करता येणार नाही. मात्र, हे खरेदी करा आणि हे करू नका, असे सरकार लोकांना सांगणार नाही. काय खरेदी करावे हा त्या-त्या व्यक्तीचा अधिकार आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले आहे.
कोविड-१९ सारख्या संकट काळात भारताने आपल्या गरजा पूर्ण करण्याबाबत उत्तम व्यवस्थापन केले आहे. मात्र, त्याच वेळी जगातील इतर देश दुसऱ्या देशांवर अवलंबून असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. भारताने जगातील १०० देशांची औषधाची गरज भागवली आहे. तसेच भारताने १० लाख एन-९५ मास्कचे उत्पादन केले आहे. इतके मोठे उत्पादन यापूर्वी भारतात झालेले नव्हते, असेही ते म्हणाले.