मिरजापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये भाजपने एनडीएच्या घटक पक्षांची मोट बांधलेली असतानाच उत्तर प्रदेशात मात्र एनडीएमध्ये मानापमान नाट्य रंगले आहे. यूपीत दबदबा असलेल्या अपना दलने भाजपवर जाहीर नाराजी व्यक्त करत भाजपच्या राज्य नेतृत्वावरच हल्लाबोल केला आहे. भाजपच्या राज्य नेतृत्वाने आम्हाला योग्य सन्मान दिला नाही तर एनडीएला मिशन-२०१९ कठीण जाईल, असा इशारा अपना दलने दिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात एनडीएत फूट पडण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अपना दल (एस)चे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष पटेल यांनी मीडियाशी बोलताना भाजपच्या प्रदेश नेतृत्वावर टीका केली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सारख्या हिंदी भाषिकपट्ट्यात भाजपचा पराभव होणं चिंताजनक आहे. या राज्यात झालेल्या पराभवावर भाजपने चिंतन करायला हवं, असा सल्ला पटेल यांनी दिला. एनडीएतील घटक पक्ष निराश आणि हताश झाले आहेत. त्यांना योग्य मानसन्मान मिळत नाही. राज्यातील भाजप नेतृत्वाचं असंच धोरण राहिलं तर एनडीएला उत्तर प्रदेशात सर्वाधिक फटका बसेल, असा इशाराही त्यांनी दिला.
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची युती मोठं आव्हान आहे. त्यामुळे यूपीतील एनडीएच्या घटक पक्षांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यावर काही करायला हवं नाही तर एनडीएला यूपीत मोठा फटका बसेल, असं ते म्हणाले. भाजपने एनडीएतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची विविध आयोग आणि महामंडळांवर नियुक्ती केली नाही. शिवाय उत्तर प्रदेशात सरकार आल्यानंतर सातत्याने केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची उपेक्षा केली जात आहे. त्यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमांचं आमंत्रण दिलं जात नाही, असा आरोपही पटेल यांनी केला आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या प्रत्येक समस्यांचं निराकरण केल्याचंही त्यांनी सांगितलं.
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची युती मोठं आव्हान आहे. त्यामुळे यूपीतील एनडीएच्या घटक पक्षांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यावर काही करायला हवं नाही तर एनडीएला यूपीत मोठा फटका बसेल, असं ते म्हणाले. भाजपने एनडीएतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची विविध आयोग आणि महामंडळांवर नियुक्ती केली नाही. शिवाय उत्तर प्रदेशात सरकार आल्यानंतर सातत्याने केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची उपेक्षा केली जात आहे. त्यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमांचं आमंत्रण दिलं जात नाही, असा आरोपही पटेल यांनी केला आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या प्रत्येक समस्यांचं निराकरण केल्याचंही त्यांनी सांगितलं.