अ‍ॅपशहर

कलम ३७० हटवणे ऐतिहासिक! : लष्कर प्रमुख

लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला ऐतिहासिक पाऊल म्हटलं आहे. या निर्णयामुळं काश्मीरला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल, असंही ते म्हणाले. लष्कर प्रमुखांनी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला इशारा दिला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2020, 12:49 pm
नवी दिल्ली: लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला ऐतिहासिक पाऊल म्हटलं आहे. या निर्णयामुळं काश्मीरला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल, असंही ते म्हणाले. लष्कर प्रमुखांनी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला इशारा दिला. लष्कर झीरो टॉलरन्सच्या नीतीवर चालते आणि दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडे अनेक पर्याय आहेत, असं ते पाकिस्तानचा उल्लेख न करता म्हणाले. यावेळी त्यांनी लष्कराच्या भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Army-chief


लष्कर दिनानिमित्त लष्कर प्रमुख नरवणे यांनी लष्कराच्या भविष्यातील योजना, दहशतवाद आदींसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 'उत्तरेकडील सीमेवर शांतता आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय हे ऐतिहासिक पाऊल आहे. या निर्णयामुळं काश्मीरला मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल,' अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराकडे अनेक पर्याय आहेत, असं सांगून त्यांनी स्पष्ट उल्लेख न करता पाकिस्तानला इशारा दिला आहे. दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स ही आमची नीती आहे. दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि त्याचा वापर करण्यास आम्ही कदापि कचरणार नाही, असं ते म्हणाले. लष्कराचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. भविष्यात होणाऱ्या युद्धाच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यासाठी इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप स्थापन करण्यात येत आहे. स्पेस, सायबर, विशेष कारवाया, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरवर भर देण्यात येत आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचं नरवणे यांनी सांगितलं.

केंद्राने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीरवर कब्जा: लष्करप्रमुख नरवणे

...तर दहशतवादी तळांवर हल्ले; लष्करप्रमुखांचा पाकला इशारा

पुलवामा हल्ल्यात देवेंद्र सिंहची भूमिका काय?

लष्करात भेदभाव नाहीच!

लष्करात जाती, धर्म आदींच्या बाबतीत कधीच भेदभाव केला जात नाही. लष्कर हे 'नाम-नमक-निशान'च्या तत्वांचं पालन करताना रक्षण करतं. लष्कर यापुढील काळातही देशवासियांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवेल, असा विश्वासही लष्कर प्रमुखांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज