दिल्ली: युद्धाचे किंवा सुरक्षेचे कोणतेही आव्हान पेलण्यासाठी भारतीय लष्कर समर्थ असून काळजीचे काहीच कारण नाही असं आश्वासन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिलं आहे. काश्मीरमधील सीमारेषेवर पाकिस्तान लांब पल्ल्याचा बंदुका आणि सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात करत आहे. या पार्श्वभूमीवर रावत बोलत होते.
भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. वेळ पडल्यास आम्ही युद्ध करण्यासही कमी करणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत दिली होती. त्यानंतर भारतातील प्रमुख शहरांमध्ये हाय अॅलर्ट जाहीर करण्यात आला. काश्मीरमध्ये सीमारेषेवरही मोठ्या प्रमाणात सैन्य पाकिस्तानने तैनात केलं आहे. याबद्दल विचारलं असता रावत म्हणाले,' घाबरायची काहीच गरज नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाकिस्तान सैन्य तैनात करत आहे. काहीही अघटित घडल्यास त्याला समर्थपणे तोंड देण्यास भारतीय सैन्य सज्ज आहे.' तसंच सीमारेषेवर तणाव वाढतो आहे का हे विचारलं असता ते म्हणाले, ' शत्रूला जर सीमारेषेवर चकमक सुरू करायची असेल तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे'.
काश्मीरमध्ये आयईडी ब्लास्ट, फिदायीन हल्ले करण्याची तयारी पाक लष्कर करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. भारतीय सैन्यातील कमांडोज जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. वेळ पडल्यास आम्ही युद्ध करण्यासही कमी करणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत दिली होती. त्यानंतर भारतातील प्रमुख शहरांमध्ये हाय अॅलर्ट जाहीर करण्यात आला. काश्मीरमध्ये सीमारेषेवरही मोठ्या प्रमाणात सैन्य पाकिस्तानने तैनात केलं आहे. याबद्दल विचारलं असता रावत म्हणाले,' घाबरायची काहीच गरज नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाकिस्तान सैन्य तैनात करत आहे. काहीही अघटित घडल्यास त्याला समर्थपणे तोंड देण्यास भारतीय सैन्य सज्ज आहे.' तसंच सीमारेषेवर तणाव वाढतो आहे का हे विचारलं असता ते म्हणाले, ' शत्रूला जर सीमारेषेवर चकमक सुरू करायची असेल तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे'.