अ‍ॅपशहर

काश्मीर: दगडफेक करणाऱ्यांमुळे २५ दहशतवादी पळाले

हिजबूल मुजाहिद्दीनचा मोहरक्या बुरहान वाणीला ठार केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच दहशतवाद्यांच्या समर्थकांनी जागोजागी आंदोलने

Maharashtra Times 27 Feb 2017, 9:30 am
मटा ऑनलाइन वृत्त । शोपिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम army losing its hold over south kashmir
काश्मीर: दगडफेक करणाऱ्यांमुळे २५ दहशतवादी पळाले


हिजबूल मुजाहिद्दीनचा मोहरक्या बुरहान वाणीला ठार केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच दहशतवाद्यांच्या समर्थकांनी जागोजागी आंदोलने करत दगडफेक केल्यामुळे दक्षिण काश्मीरमधून आतापर्यंत २५ दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

सुरक्षा दलाच्या ताज्या अहवालात हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. स्थानीक लोक दहशवाद्यांना मदत करत असल्यानेच दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे जवानांना काम करणे कठिण झाल्याचे या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. पुलवामा, कुलगाम, शोपिया आणि अनंतनागमधून ८० तरूण गायब झाले आहेत. या सर्व जिल्ह्यात राजकारण्यांचा मोठा प्रभाव असून त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. दक्षिण काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांवर अत्यंत कमी गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही हा अहवाल सांगतो. गांदरबल जिल्ह्यात दगडफेक करणाऱ्यांवर केवळ १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एप्रिलमध्ये या भागात लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. हा परिसर पीडीपी गड मानला जातो. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत या परिसरातील कारवाई अत्यंत धीम्यागतीनं करा असे आदेशच स्थानीक पोलिसांना देण्यात आले आहेत.

केवळ राजकीय फायद्यासाठी पीडीपी आणि भाजप सरकार पोलिसांना त्यांचं काम प्रामाणिकपणे करू देत नाही. अटक करण्यात आलेल्या लोकांना सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते अनवर भट्ट यांनी केला आहे. दरम्यान बुरहान वाणीच्या मृत्यूनंतर या भागात ७० पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचंही सांगण्यात येतं. त्यामुळे या परिसरात पॅरा कंमांडो फोर्स तैनात करण्याची योजना केंद्र सरकार आखत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज