नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला काँग्रेस कडाडून विरोध करत असतानाच, पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीही टीकास्त्र सोडलं आहे. जम्मू-काश्मीरचे विभाजन करून राष्ट्रीय एकता साधता येत नाही. सरकारने हा निर्णय घेऊन राज्यघटनेचे उल्लंघन केले आहे. हा देश जनतेमुळं निर्माण झाला असून, जमिनीच्या तुकड्यानं नव्हे, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारने सोमवारी कलम ३७० रद्द करण्याचा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने राज्यसभेत जोरदार विरोध केला. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. 'एकतर्फी निर्णयाने जम्मू-काश्मीरचे विभाजन करणे, लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकणे आणि राज्यघटनेचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकता साधता येते का,' असा सवाल राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला आहे. जनतेमुळे देशाची निर्मिती होते, जमिनीच्या एका तुकड्याने नाही, असंही ते म्हणाले. सत्तेचा अशा पद्धतीने गैरवापर केल्यानं देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
...तरच काँग्रेसमध्ये राहा: आझाद
कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी फटकारले. ज्या लोकांना जम्मू-काश्मीर किंवा काँग्रेसचा इतिहास माहिती नाही त्यांच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. त्यांनी आधी जम्मू-काश्मीर आणि काँग्रेसचा इतिहास वाचावा आणि नंतरच काँग्रेसमध्ये राहावे, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारने सोमवारी कलम ३७० रद्द करण्याचा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने राज्यसभेत जोरदार विरोध केला. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. 'एकतर्फी निर्णयाने जम्मू-काश्मीरचे विभाजन करणे, लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकणे आणि राज्यघटनेचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकता साधता येते का,' असा सवाल राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला आहे. जनतेमुळे देशाची निर्मिती होते, जमिनीच्या एका तुकड्याने नाही, असंही ते म्हणाले. सत्तेचा अशा पद्धतीने गैरवापर केल्यानं देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
...तरच काँग्रेसमध्ये राहा: आझाद
कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी फटकारले. ज्या लोकांना जम्मू-काश्मीर किंवा काँग्रेसचा इतिहास माहिती नाही त्यांच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. त्यांनी आधी जम्मू-काश्मीर आणि काँग्रेसचा इतिहास वाचावा आणि नंतरच काँग्रेसमध्ये राहावे, असं ते म्हणाले.