श्रीनगर: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० केंद्र सरकारने हटवल्यानंतर राज्यात घालण्यात आलेले निर्बंध १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनानंतर शिथील करण्यात येतील, असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं. राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत फोन आणि इंटरनेटवरील निर्बंध कायम राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
१५ ऑगस्टनंतर राज्यातील दळणवळण सुविधांवरील निर्बंध शिथील करण्यात येतील. मात्र, फोन आणि इंटरनेट ही माध्यमे तरुणांना चिथावणी देण्याचे किंवा त्यांची दिशाभूल करण्याचे काम करतात. त्यामुळे राज्यातील परिस्थिती सर्वसामान्य होत नाही, तोपर्यंत त्यावरील निर्बंध कायम राहतील, असं मलिक यांनी स्पष्ट केलं. फोन आणि इंटरनेट ही शत्रूंसाठी शस्त्रे आहेत. त्यामुळं परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत ही शस्त्रे आम्ही शत्रूंच्या हाती देऊ इच्छित नाही. एका आठवड्यात किंवा दहा दिवसांत सर्व काही सुरळीत होईल. त्यानंतर हळूहळू संपर्काच्या माध्यमांवरील निर्बंधही उठवण्यात येतील, असंही ते म्हणाले.
यावेळी मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांच्याकडे माहितीचा अभाव आहे, असं सांगत त्यांना दिलेले निमंत्रणही मागे घेतले. मी स्वतः त्यांना येथील परिस्थिती पाहण्यासाठी निमंत्रित केलं होतं. मात्र, त्यांनी काही अटी-शर्ती आमच्यासमोर ठेवल्या. त्यांना शिष्टमंडळासोबत येथे यायचं आहे. ताब्यात असलेल्या नेत्यांना भेटण्याची त्यांची इच्छा आहे. पण ते शक्य नाही. त्यामुळे त्यांना दिलेले निमंत्रण मागे घेत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
१५ ऑगस्टनंतर राज्यातील दळणवळण सुविधांवरील निर्बंध शिथील करण्यात येतील. मात्र, फोन आणि इंटरनेट ही माध्यमे तरुणांना चिथावणी देण्याचे किंवा त्यांची दिशाभूल करण्याचे काम करतात. त्यामुळे राज्यातील परिस्थिती सर्वसामान्य होत नाही, तोपर्यंत त्यावरील निर्बंध कायम राहतील, असं मलिक यांनी स्पष्ट केलं. फोन आणि इंटरनेट ही शत्रूंसाठी शस्त्रे आहेत. त्यामुळं परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत ही शस्त्रे आम्ही शत्रूंच्या हाती देऊ इच्छित नाही. एका आठवड्यात किंवा दहा दिवसांत सर्व काही सुरळीत होईल. त्यानंतर हळूहळू संपर्काच्या माध्यमांवरील निर्बंधही उठवण्यात येतील, असंही ते म्हणाले.
यावेळी मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांच्याकडे माहितीचा अभाव आहे, असं सांगत त्यांना दिलेले निमंत्रणही मागे घेतले. मी स्वतः त्यांना येथील परिस्थिती पाहण्यासाठी निमंत्रित केलं होतं. मात्र, त्यांनी काही अटी-शर्ती आमच्यासमोर ठेवल्या. त्यांना शिष्टमंडळासोबत येथे यायचं आहे. ताब्यात असलेल्या नेत्यांना भेटण्याची त्यांची इच्छा आहे. पण ते शक्य नाही. त्यामुळे त्यांना दिलेले निमंत्रण मागे घेत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.