नवी दिल्ली : सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दिल्ली जल मंडळाच्या फाइल सरसकट ताब्यात घेत असून, त्यातून आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.केजरीवाल यांच्याकडे पाणीपुरवठ्याचीही जबाबदारी आहे. केजरीवाल यांनी ट्विट करून हा आरोप केला. सीबीआय आणि एसीबीने फाइल ताब्यात घेण्याची कारणे सांगावीत किंवा दिल्लीकरांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केजरीवालांचा आरोप
सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग दिल्ली जल मंडळाच्या फाइल सरसकट ताब्यात घेत असून, त्यातून आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ...
Maharashtra Times 10 Jun 2018, 2:51 am