अ‍ॅपशहर

‘होय, आमच्या चुका झाल्या’

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आमच्याकडून चुका झाल्या. त्याबाबत आम्ही आत्मचिंतन करून त्या चुका सुधारू. पराभवाचे वास्तव स्वीकारून आता कारणे देत बसण्यापेक्षा कृती करण्याची वेळ आली आहे

Maharashtra Times 30 Apr 2017, 3:59 am
नवी दिल्ली ः ‘दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आमच्याकडून चुका झाल्या. त्याबाबत आम्ही आत्मचिंतन करून त्या चुका सुधारू. पराभवाचे वास्तव स्वीकारून आता कारणे देत बसण्यापेक्षा कृती करण्याची वेळ आली आहे’, असे ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पराभव स्वीकारला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arvind kejriwal has record of making mistakes
‘होय, आमच्या चुका झाल्या’


नुकत्याच झालेल्या पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आपचा दारुण पराभव झाला होता. मात्र, केजरीवाल यांनी या पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’वर फोडले होते. दिल्ली महापालिकेची निवडणूक ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवर घ्यावी, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात येत होती. मात्र, ‘आप’च्या नेत्यांकडूनही केजरीवाल यांच्यावर टीका झाल्याच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विट करून आत्मचिंतन करणार असल्याचे म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज