अ‍ॅपशहर

CM केजरीवाल म्हणाले, 'PM मोदींनीच आम्हाला इमानदारीचे प्रमाणपत्र दिले'

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. गोव्यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी आज घरोघरी जाऊन प्रचार केला. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jan 2022, 5:13 pm
पणजी: 'आम आदमी पक्षा'चे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या गोवा दौऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. 'गोव्यातील जनता काँग्रेस-भाजपला कंटाळली आहे. गोव्यातील जनतेला बदल हवा आहे आणि या वेळी खरा बदल घडेल, असे वाटते', असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गोव्यात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arvind kejriwal held a door to door campaign in a poll bound goa
केजरीवाल म्हणाले, 'PM मोदींनीच आम्हाला इमानदारीचे प्रमाणपत्र दिले आहे'


अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. 'निवडणूक १४ फेब्रुवारीला आहे आणि गोव्यातील मतदानर खूप उत्साही आहेत. वेळी खरा बदल होईल, असे त्यांना वाटते. पूर्वी नागरिकांकडे पर्याय नव्हता. एकदा भाजप आणि एकदा काँग्रेस येत असल्याने जनता कंटाळली होते आणि आता त्यांना बदल हवा आहे, असा दावा केजरीवाल यांनी यावेळी केला.

'गोव्यात खूप भ्रष्टाचार आहे'

'अधित हुशार आणि चांगले गुण मिळूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाहीए. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. लाच दिल्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील असले पाहिजे, त्यांचे मतदार असले पाहिजे. काही मतदारसंघात सर्व नोकऱ्या गेल्या आहेत. हा वाईट मार्ग आहे', असा आरोप केजरीवाल यांनी केला.

'आम्ही दिल्लीत प्रामाणिकपणे सरकार चालवले'

'आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असे प्रश्न नागरिकांनी प्रश्न केला. चांगले काम करणार, असे निवडणुकीच्या काळात सर्वच पक्ष सांगतात. पण आम्ही हे दिल्लीत करून दाखवले आहे. आमचा डीएनए काय आहे हे दिल्लीच्या कारभारावरून दिसून येते. तिथे आम्ही प्रामाणिकपणे सरकार चालवून दाखवले आहे. ‘आप’ हा देशातील सर्वात प्रामाणिक पक्ष असल्याचे इमानदारीचे प्रमाणपत्र खुद्द पंतप्रधान मोदींनीच दिले आहे', असे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले.

charanjit singh channi : पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलणार? मुख्यमंत्री चन्नींनी केली 'ही' मागणी

'मोदींनी आमच्या आमदारांवर छापे टाकले'

'मोदींनी माझ्यावर आणि सिसोदियांवर छापा टाकला. आमच्या २१ आमदारांना अटक, सीबीआयपासून ईडीपर्यंत सर्व छापे टाकण्यात आले. आमच्या ४०० फाइल्स तपासण्यासाठी एक कमिशन तयार करण्यात आले होते. पण एकही चूक आढळली नाही, असे केजरीवाल गोव्यात म्हणाले.

aparna yadav : भाजपही यूपीत मोठा धमाका करणार, मुलायम सिंहांच्या घराण्यातच लावला 'सुरुंग'!

निवडणूक आयोगाने गोवा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गोव्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्चला निकाल लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज