नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज संसदेचं कामकाज पुन्हा एकदा सुरू झालं. परंतु, राज्यसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी खासदारांनी इंधर दरवाढ, घरगुती गॅस दरवाढ अशा वेगवेगळ्या विषयांवर सरकारला घेरलं. या मुद्यावर राज्यसभेत जोरदार हंगामा पाहायला मिळाला. त्यामुळे सदनाचं कामकाज तासाभरासाठी स्थगित करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याचं दिसताच सभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी १ वाजपर्यंत स्थगित करण्यात आलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाल्यानंतर राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाझलेल्या किंमतींचा मुद्दा उचलून धरला. सदनाचं कामकाज स्थगित करत या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.
आज संपूर्ण देशातील लोक चिंतेत आहेत. आम्ही सभापतींकडे मागणी करतो की सदनाचं कामकाज स्थगित करून पेट्रोल डिझेल्च्या किंमतींवर चर्चा केली जावी. आज देशात पेट्रोल १०० रुपयांवर तर डिझेल जवळपास ८० रुपये प्रती लीटरवर पोहचलंय, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं. नागरिकांना इंधन, गॅस दरवाढीसंदर्भात सरकारचं म्हणणं ऐकायचंय, असं विरोधकांनी म्हटलं.
'केवळ अत्यावश्यक मुद्यावर चर्चा'
मात्र, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची मागणी अस्वीकार केली. 'मल्लिकार्जु खर्गे यांच्याकडून आपल्याला नियम २६७ नुसार कार्यस्थगनाची नोटीस मिळाली आहे. परंतु, नियम २६७ नुसार सदनाचं सामान्य कामकाज स्थगित करून केवळ एखाद्या अत्यावश्यक मुद्यावर चर्चा केली जाते. त्यामुळे ही मागणी अस्वीकार केली जात आहे' असं शून्यकाळात नायडू यांनी म्हटलं. चालू सत्रात विनियोग विधेयकावरील चर्चेदरम्यान आणि इतर वेळेस सदस्य या संदर्भात आपलं म्हणणं मांडू शकतात, असंही नायडू यांनी म्हटलं. सभापतींकडून मागणी फेटाळल्यात आल्यानंतर विरोधकांनी संसदेत जोरदार गोंधळ घातला.
आज संपूर्ण देशातील लोक चिंतेत आहेत. आम्ही सभापतींकडे मागणी करतो की सदनाचं कामकाज स्थगित करून पेट्रोल डिझेल्च्या किंमतींवर चर्चा केली जावी. आज देशात पेट्रोल १०० रुपयांवर तर डिझेल जवळपास ८० रुपये प्रती लीटरवर पोहचलंय, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं. नागरिकांना इंधन, गॅस दरवाढीसंदर्भात सरकारचं म्हणणं ऐकायचंय, असं विरोधकांनी म्हटलं.
'केवळ अत्यावश्यक मुद्यावर चर्चा'
मात्र, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची मागणी अस्वीकार केली. 'मल्लिकार्जु खर्गे यांच्याकडून आपल्याला नियम २६७ नुसार कार्यस्थगनाची नोटीस मिळाली आहे. परंतु, नियम २६७ नुसार सदनाचं सामान्य कामकाज स्थगित करून केवळ एखाद्या अत्यावश्यक मुद्यावर चर्चा केली जाते. त्यामुळे ही मागणी अस्वीकार केली जात आहे' असं शून्यकाळात नायडू यांनी म्हटलं. चालू सत्रात विनियोग विधेयकावरील चर्चेदरम्यान आणि इतर वेळेस सदस्य या संदर्भात आपलं म्हणणं मांडू शकतात, असंही नायडू यांनी म्हटलं. सभापतींकडून मागणी फेटाळल्यात आल्यानंतर विरोधकांनी संसदेत जोरदार गोंधळ घातला.