अ‍ॅपशहर

owaisi slams pakistan : पाकिस्तानवर बरसले ओवेसी, 'क्रिकेटचा इस्लामशी काय संबंध, शेख राशिद वेडे झाले'

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. पाकिस्तानचे गृहमंत्री यांनी हा इस्लामचा विजय असल्याचं म्हटलं. यावरून एमआयएमचे नेते पाकिस्तानवर बरसले आहेत. इस्लाम आणि क्रिकेटचा काय संबंध आहे? असा सवार ओवेसी यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Oct 2021, 3:34 pm
लखनऊः एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या शेजारी देशातील एका बिचारा मंत्री वेडा झाला आहे. त्याने क्रिकेट सामन्यामधील विजयचा संबंध इस्लामचा विजय असल्याचं म्हटलं आहे. अल्लाहचा शुक्र आहे आहे, आम्ही पाकमध्ये गेलो नाही. अन्यथा अशा येडपटांना बघावं लागलं असतं. इस्लामचा क्रिकेटशी काय संबंध आहे?, असं ओवेसी म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम asaduddin owaisi slams pakistan on connect cricket to islam
पाकिस्तानवर बरसले ओवेसी, 'क्रिकेटचा इस्लामशी काय संबंध, शेख राशिद वेडे झाले'


आपला देश (पाकिस्तान) चीनकडे गहाण ठेवता आणि लाज नाही वाटत आणि इस्लामबद्दल बोलता. त्याकडे देश गहाण ठेवलाय, ज्याने २० लाख मुस्लिमांना कैद केलं आहे. त्यांना जबरदस्तीने डुकराचं मांस खायला लावलं जात आहे. तुम्ही साधं मलेरियावर औषधही बनवू शकत नाही, मोटरसायकलचे टायर बनवू शकत नाही, भारत खूप पुढे आहे, त्यामुळे आमच्याशी पंगा घेऊ नका, असं म्हणत ओवेसी पाकिस्तानवर बरसले.

आधी मेरठ, मग हाशिमपुरा आणि नंतर मलियानामध्ये झालेल्या दंगलीत किती नागरिकांचा मृत्यू झाला? यानंतर २०१३ मध्ये मुझफ्फरनगरमध्ये दंगल उसळली होती. त्या दंगलींची आठवण करून राजकारणी मुस्लिमांची मतं मागत आहेत. मतांसाठी आलेलो नाही. त्या पीडितांना न्याय देण्यासाठी आणि त्यांची राजकीय ताकद वाढवण्यासाठी आले आहे, असं ओवेसी म्हणाले.

amit shah's master plan to win up elections : अमित शहांचा यूपी निवडणुकीसाठी मास्टर प्लान! १२५ आमदारांचे तिकीट कपले जाणा

Leander Paes Join TMC: टेनिस खेळाडू लिएन्डर पेस, अभिनेत्री नफीसा अली तृणमूलमध्ये दाखल

मुस्लिम किती काळ गालिचे घालणार?

आम्ही मुस्लिमांना लोकशाही मार्गाने न्याय देऊ. दंगली होऊ देणार नाही. मुस्लिमांना राजकीय शक्ती बनायला हवं. सपा, बसपा, काँग्रेस आणि आरएलडीसाठी किती काळ गालिचे टाकत राहणार. आता राजकीय मुकुट डोक्यावर सजवण्याची वेळ आली आहे. आपल्या AIMIM पक्षाला मत देण्याची वेळ आली आहे. मुस्लिमांची राजकीय ताकद वाढवणं हा आपल्या जीवनाचा उद्देश असल्याचं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज