काश्मीर खोऱ्यातील कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून आता राजकारण सुरू झालं आहे. मुलीच्या निर्घृण हत्येच्या घटनेला गोहत्येशी जोडले जात असून जम्मू आणि काश्मीर या विभागांतील अंतर्गत धुसफूसही यानिमित्त उघड होत आहे. या घटनेच्या विरोधात एकीकडे निदर्शने होत आहेत, दुसरीकडे आरोपींच्या समर्थनार्थही जमाव रस्त्यावर येत आहेत. त्यामुळं घाबरलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी गावं सोडल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसिफाचे वडील मोहम्मद युसूफ पुजवाला हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह रात्रीच घर सोडून निघून गेले आहेत. ते नेमके कुठं गेले आहेत, हे कळू शकलेलं नाही.
>> नेमकं काय झालं?
१० जानेवारीला पीडित मुलगी ही बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेल्यापासून बेपत्ता झाली.
१२ जानेवारीला मुलीचे वडील महंमद युसूफ यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदविली.
१७ जानेवारीला तिचा मृतदेह रासम्मा गावाजवळच्या जंगलात आढळून आला.
२३ जानेवारीला राज्य सरकारने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले आणि विशेष तपास पथकाची निर्मिती केली.
२० मार्च रोजी प्रकरणातील मुख्य आरोपी सांजीराम याने शरणागती पत्करली.
९ एप्रिल रोजी विशेष तपास पथकाने आरोपपत्र दाखल केले
>>आरोपपत्र
विशेष तपास पथकाच्या आरोपत्रानुसार कठुआ परिसरात वास्तव्याला असलेल्या बकरवाल समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण व्हावे आणि त्यांनी परिसर सोडून जावे, या हेतूने एका देवस्थानाचा प्रमुख असलेल्या सांझीराम याने मुलीच्या अपहरणाचा आणि हत्येचा कट रचला. हरवलेले घोडे शोधण्याचे आमिष दाखवून सांझीराम त्याच्या अल्पवयीन पुतण्याच्या मदतीने मुलीला मंदिरामध्ये बंदिस्त केले. आरडाओरड करू नये यासाठी तिला मादक द्रव्य पाजण्यात आले. यानंतर तब्बल पाच दिवस सांझीराम आणि इतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. हे घृणास्पद 'कर्तव्य' बजावण्यासाठी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे शिकत असलेल्या सांझीरामच्या मुलाला बोलावून घेण्यात आले. पाच दिवसांनंतर मुलीला जंगलात फेकून देण्यात आले. ती जिवंत राहू नये, यासाठी सांझीरामच्या अल्पवयीन पुतण्याने तिच्या चेहऱ्यावर मोठा दगड टाकला आणि तिची हत्या केली, असा आरोप आहे.
>>आरोपी
कठुआ जिल्ह्यातील एका देवस्थानाचा प्रमुख सांझीराम या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सांजीराम याच्यासह विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरीया, सुरेंद्र वर्मा, प्रवेश कुमार उर्फ मन्नू, सांजीरामचा मुलगा विशाल जंगरोटा आणि अल्पवयीन पुतण्या यांनाही यांच्यावरही बलात्कार आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याबद्दल हेड कॉन्टेबल तिलक राज आणि पोलिस उपनिरीक्षक यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
>>काश्मिरात खळबळ
या प्रकरणाची संवदेनशीलता लक्षात घेत विशेष तपास पथकानेही नेटाने तपास केला. तपास पथकाला राजकीय दबावांना सामोरे जावे लागत असल्याचाही आरोप झाला. मात्र, त्या दबावांना न जुमानता तपास पथकाने आरोपपत्र दाखल केले. सोमवारी, ९ एप्रिल रोजी विशेष तपास पथकाला जम्मू हायकोर्ट बार असोसिएशनच्या वकिलांनी विरोध केल्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर पोहोचले.
>> जातीय तणाव
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपींच्या विरोधात आणि समर्थनार्थ निदर्शने झाली. बकरवाल समाजाकडून गोहत्या केली जात असल्याचा संशय सांझीराम आणि इतर गावकऱ्यांना होता. त्यातूनच हा घृणास्पद प्रकार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाला जम्मू आणि काश्मीर या दोन विभागांमधील वादाचीही किनार आहे. काश्मीरमधील पोलिसांवर आमचा विश्वास नाही. ते सांझीराम आणि इतरांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत आहेत, असा आरोप कठुआ परिसरातील नागरिकांनी केला आहे.
>> नेमकं काय झालं?
१० जानेवारीला पीडित मुलगी ही बकऱ्या चारण्यासाठी जंगलात गेल्यापासून बेपत्ता झाली.
१२ जानेवारीला मुलीचे वडील महंमद युसूफ यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदविली.
१७ जानेवारीला तिचा मृतदेह रासम्मा गावाजवळच्या जंगलात आढळून आला.
२३ जानेवारीला राज्य सरकारने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले आणि विशेष तपास पथकाची निर्मिती केली.
२० मार्च रोजी प्रकरणातील मुख्य आरोपी सांजीराम याने शरणागती पत्करली.
९ एप्रिल रोजी विशेष तपास पथकाने आरोपपत्र दाखल केले
>>आरोपपत्र
विशेष तपास पथकाच्या आरोपत्रानुसार कठुआ परिसरात वास्तव्याला असलेल्या बकरवाल समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण व्हावे आणि त्यांनी परिसर सोडून जावे, या हेतूने एका देवस्थानाचा प्रमुख असलेल्या सांझीराम याने मुलीच्या अपहरणाचा आणि हत्येचा कट रचला. हरवलेले घोडे शोधण्याचे आमिष दाखवून सांझीराम त्याच्या अल्पवयीन पुतण्याच्या मदतीने मुलीला मंदिरामध्ये बंदिस्त केले. आरडाओरड करू नये यासाठी तिला मादक द्रव्य पाजण्यात आले. यानंतर तब्बल पाच दिवस सांझीराम आणि इतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. हे घृणास्पद 'कर्तव्य' बजावण्यासाठी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे शिकत असलेल्या सांझीरामच्या मुलाला बोलावून घेण्यात आले. पाच दिवसांनंतर मुलीला जंगलात फेकून देण्यात आले. ती जिवंत राहू नये, यासाठी सांझीरामच्या अल्पवयीन पुतण्याने तिच्या चेहऱ्यावर मोठा दगड टाकला आणि तिची हत्या केली, असा आरोप आहे.
>>आरोपी
कठुआ जिल्ह्यातील एका देवस्थानाचा प्रमुख सांझीराम या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सांजीराम याच्यासह विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरीया, सुरेंद्र वर्मा, प्रवेश कुमार उर्फ मन्नू, सांजीरामचा मुलगा विशाल जंगरोटा आणि अल्पवयीन पुतण्या यांनाही यांच्यावरही बलात्कार आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याबद्दल हेड कॉन्टेबल तिलक राज आणि पोलिस उपनिरीक्षक यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
>>काश्मिरात खळबळ
या प्रकरणाची संवदेनशीलता लक्षात घेत विशेष तपास पथकानेही नेटाने तपास केला. तपास पथकाला राजकीय दबावांना सामोरे जावे लागत असल्याचाही आरोप झाला. मात्र, त्या दबावांना न जुमानता तपास पथकाने आरोपपत्र दाखल केले. सोमवारी, ९ एप्रिल रोजी विशेष तपास पथकाला जम्मू हायकोर्ट बार असोसिएशनच्या वकिलांनी विरोध केल्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर पोहोचले.
>> जातीय तणाव
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपींच्या विरोधात आणि समर्थनार्थ निदर्शने झाली. बकरवाल समाजाकडून गोहत्या केली जात असल्याचा संशय सांझीराम आणि इतर गावकऱ्यांना होता. त्यातूनच हा घृणास्पद प्रकार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाला जम्मू आणि काश्मीर या दोन विभागांमधील वादाचीही किनार आहे. काश्मीरमधील पोलिसांवर आमचा विश्वास नाही. ते सांझीराम आणि इतरांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत आहेत, असा आरोप कठुआ परिसरातील नागरिकांनी केला आहे.