मोरीगाव, आसाम : गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शुक्रवारी आसाममध्ये एका रॅलीला संबोधताना काँग्रेस आणि एआययूडीएफ वर जोरदार हल्लाबोल केला. या दरम्यान अमित शहांनी एका नव्या शब्दाचा उच्चार केलाय. आसाममध्ये 'लव्ह जिहाद'सोबत 'लँड जिहाद'चाही प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचं सरकार कायदा आणणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय. मोरीगावमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. एआययूडीएफ प्रमुख बदरुद्दीन अजमल यांना आसामची ओळख बनू देणार नाही, असा निर्धार अमित शहा यांनी गर्दीसमोर व्यक्त केलाय.
'राहुल गांधी म्हणतात की बदरुद्दीन अजमल आसामची ओळख आहेत. बदरुद्दीन अजमल काँग्रेसची ओळख असू शकतात परंतु, आसामचे नाही. आसामची ओळख ही श्रीमन शंकर देव, श्रीमन माधवदेव जी असू शकतील' असंही गृहमंत्र्यांनी म्हटलंय.
चुकूनही आसाममध्ये काँग्रेस आणि बदरुद्दीन सरकार आलं तर प्रदेशात घुसखोरी वाढीस लागेल. तुम्हाला आसाममध्ये घुसखोरी हवीय का? घुसखोरीमुक्त आसाम नकोय का? काँग्रेस पक्ष घुसखोरमुक्त आसाम देऊ शकत नाही, असा दावाही यावेळी अमित शहांनी केलाय.
काझीरंगाच्या जंगलावर घुसखोरांनी ताबा मिळवला होता. लँड जिहादच्या माध्यमातून आसामची ओळख बदलण्याचं काम बदरुद्दीन अजमल यांनी केलं. काँग्रेस आज त्याच बदरुद्दीन अजमलसोबत आहे. तर भाजपनं आसामला आंदोलन मुक्त, दहशतवाद मुक्त बनवलंय. आसाममध्ये भाजपची सत्ता आली तर लव्ह अॅन्ड लँड जिहादचा धोका नियंत्रित करण्यासाठी कायदा आणण्यात येईल, असं गृहमंत्र्यांनी म्हटलंय.
आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी इतर राज्यांसोबत जाहीर होईल.
'राहुल गांधी म्हणतात की बदरुद्दीन अजमल आसामची ओळख आहेत. बदरुद्दीन अजमल काँग्रेसची ओळख असू शकतात परंतु, आसामचे नाही. आसामची ओळख ही श्रीमन शंकर देव, श्रीमन माधवदेव जी असू शकतील' असंही गृहमंत्र्यांनी म्हटलंय.
चुकूनही आसाममध्ये काँग्रेस आणि बदरुद्दीन सरकार आलं तर प्रदेशात घुसखोरी वाढीस लागेल. तुम्हाला आसाममध्ये घुसखोरी हवीय का? घुसखोरीमुक्त आसाम नकोय का? काँग्रेस पक्ष घुसखोरमुक्त आसाम देऊ शकत नाही, असा दावाही यावेळी अमित शहांनी केलाय.
काझीरंगाच्या जंगलावर घुसखोरांनी ताबा मिळवला होता. लँड जिहादच्या माध्यमातून आसामची ओळख बदलण्याचं काम बदरुद्दीन अजमल यांनी केलं. काँग्रेस आज त्याच बदरुद्दीन अजमलसोबत आहे. तर भाजपनं आसामला आंदोलन मुक्त, दहशतवाद मुक्त बनवलंय. आसाममध्ये भाजपची सत्ता आली तर लव्ह अॅन्ड लँड जिहादचा धोका नियंत्रित करण्यासाठी कायदा आणण्यात येईल, असं गृहमंत्र्यांनी म्हटलंय.
आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी इतर राज्यांसोबत जाहीर होईल.