वृत्तसंस्था, गुवाहाटी
‘आसाममधील नागरिकांनी आता काँग्रेसला नाकारले आहे. आसाम आता अधिक काळ अविकसित न राहता बाकीच्या राज्यांसोबत या राज्याची प्रगती झाली पाहिजे. काँग्रेसने बराच काळ राज्याला अंधारात ठेवले असून, आता या राज्याला त्यातून बाहेर यायचे आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, आसाम गण परिषद (एजीपी) आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) या आघाडीला लोक निवडून देतील,’ असा दावा भाजपचे आसाम मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांनी केला आहे. सोनोवाल यांनी ‘एजीपी’चे अध्यक्ष अतुल बोरा आणि ‘बीपीएफ’चे सर्वेसर्वा हग्रामा मोहिलरी यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
‘आसामच्या नागरिकांना भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीपासून बदल हवा आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारला पदच्युत करून भाजपप्रणित आघाडीला लोक निवडून देतील,’ असे सोनोवाल म्हणाले. बांगलादेश आणि पाकिस्तानातील अल्पसंख्याक निर्वासितांच्या वास्तव्याला मान्यता देण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला ‘एजीपी’चा विरोध असल्याकडे सोनोवाल यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर, ‘आघाडीतील घटक पक्षांमध्ये काही मतभेद आहेत, पण ते दूर होतील. आम्ही एकत्र आलो आहोत, कारण सर्वसामान्य नागरिकांना तसे वाटते,’ असा विश्वासही सोनोवाल यांनी व्यक्त केला.
‘चर्चेला बसल्यानंतर सुटू शकणार नाहीत, असे कोणतेही मुद्दे नाहीत. दर वेळी भावनाप्रधान राहून उपयोगी नाही. तर्कशुद्ध विचारही हवाच,’ असे मत ‘एजीपी’चे अध्यक्ष अतुल बोरा यांनी व्यक्त केले. भाजपसोबतच्या जागावाटपासंदर्भात पक्षाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याबद्दल पत्रकारांनी बोरा यांना विचारले असता, ‘मतभेद दूर होत असून, आघाडी यशस्वी होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘जागावाटपात भाजपने दिलेल्या २४ जागांसह आणखी सहा जागांवरही एजीपी लढणार असून, या जागांवर भाजपशी मैत्रिपूर्ण लढत होणार आहे,’ असेही बोरा यांनी सांगितले.
‘काँग्रेसचे दिवस आता भरत आले आहेत. भाजपप्रणित आघाडी त्यांना मुळापासून उखडून टाकेल. काँग्रेस पक्ष बोडो पक्षाला लोकांसाठी काम करू देत नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतची आघाडी तोडली,’ असे ‘बीपीएफ’चे सर्वेसर्वा हग्रामा मोहिलरी यांनी सांगितले.
जागावाटपावरून काही मतभेद जरूर आहेत; मात्र राज्याच्या भल्यासाठी काँग्रेसला हरवण्याकरिता कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. काँग्रेस आणि ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकांना या दोन्हींचे खरे रंग माहिती आहेत. - सर्वानंद सोनोवाल, भाजपचे आसाम मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
‘आसाममधील नागरिकांनी आता काँग्रेसला नाकारले आहे. आसाम आता अधिक काळ अविकसित न राहता बाकीच्या राज्यांसोबत या राज्याची प्रगती झाली पाहिजे. काँग्रेसने बराच काळ राज्याला अंधारात ठेवले असून, आता या राज्याला त्यातून बाहेर यायचे आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, आसाम गण परिषद (एजीपी) आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) या आघाडीला लोक निवडून देतील,’ असा दावा भाजपचे आसाम मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांनी केला आहे. सोनोवाल यांनी ‘एजीपी’चे अध्यक्ष अतुल बोरा आणि ‘बीपीएफ’चे सर्वेसर्वा हग्रामा मोहिलरी यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
‘आसामच्या नागरिकांना भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीपासून बदल हवा आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारला पदच्युत करून भाजपप्रणित आघाडीला लोक निवडून देतील,’ असे सोनोवाल म्हणाले. बांगलादेश आणि पाकिस्तानातील अल्पसंख्याक निर्वासितांच्या वास्तव्याला मान्यता देण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला ‘एजीपी’चा विरोध असल्याकडे सोनोवाल यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर, ‘आघाडीतील घटक पक्षांमध्ये काही मतभेद आहेत, पण ते दूर होतील. आम्ही एकत्र आलो आहोत, कारण सर्वसामान्य नागरिकांना तसे वाटते,’ असा विश्वासही सोनोवाल यांनी व्यक्त केला.
‘चर्चेला बसल्यानंतर सुटू शकणार नाहीत, असे कोणतेही मुद्दे नाहीत. दर वेळी भावनाप्रधान राहून उपयोगी नाही. तर्कशुद्ध विचारही हवाच,’ असे मत ‘एजीपी’चे अध्यक्ष अतुल बोरा यांनी व्यक्त केले. भाजपसोबतच्या जागावाटपासंदर्भात पक्षाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याबद्दल पत्रकारांनी बोरा यांना विचारले असता, ‘मतभेद दूर होत असून, आघाडी यशस्वी होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘जागावाटपात भाजपने दिलेल्या २४ जागांसह आणखी सहा जागांवरही एजीपी लढणार असून, या जागांवर भाजपशी मैत्रिपूर्ण लढत होणार आहे,’ असेही बोरा यांनी सांगितले.
‘काँग्रेसचे दिवस आता भरत आले आहेत. भाजपप्रणित आघाडी त्यांना मुळापासून उखडून टाकेल. काँग्रेस पक्ष बोडो पक्षाला लोकांसाठी काम करू देत नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतची आघाडी तोडली,’ असे ‘बीपीएफ’चे सर्वेसर्वा हग्रामा मोहिलरी यांनी सांगितले.
जागावाटपावरून काही मतभेद जरूर आहेत; मात्र राज्याच्या भल्यासाठी काँग्रेसला हरवण्याकरिता कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. काँग्रेस आणि ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकांना या दोन्हींचे खरे रंग माहिती आहेत. - सर्वानंद सोनोवाल, भाजपचे आसाम मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार