दिब्रुगड / गुवाहाटी: आसामच्या तिनसुकीयामध्ये शासकीय गॅस कंपनी 'ऑईल इंडिया'च्या विहिरीतील भीषण आगीवर अद्याप नियंत्रण आलेले नाही. या अपघातात दोन अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आसामचा माजी फुटबॉलपटू दुर्लोव गोगोई याचा समावेश आहे. गोगोईने १९ वर्षांखालील आणि २१ वर्षांखालील गटात अनेक स्पर्धांमध्ये आसामचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, ही आग विझविण्यासाठी चार आठवडे किंवा एक महिना लागू शकेल, असे सांगितले जात आहे.
या आगीनंतर अग्निशमन दलाचे दोन जवान बेपत्ता झाले होते, असे ऑइल इंडियाचे प्रवक्ते त्रिदिव हजारिका यांनी सांगितले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. बुधवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाने दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. दुरलोव गोगोई आणि ताकेश्वर गोहाईन अशी दोघांची ओळख पटली असून दोघेही कंपनीच्या अग्निशमन विभागात सहाय्यक ऑपरेटर आहेत. आग विझविण्याच्या प्रयत्नात ओएनजीसीच्या अग्निशमन दलाचा एक कर्मचारी किरकोळ भाजला आहे.
१५ दिवसांपासून होतेय गॅस गळती
येथे गेल्या १५ दिवसांपासून गॅसची अनियंत्रित गळती होत होती. त्यानंतर मंगळवारी इथे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांचे मृतदेह अग्निशमनस्थळाजवळील पाणी पसरलेल्या भागात सापडले, अशी माहिती त्रिदिव हजारिका यांनी दिली.
स्थानिक लोकांनी तेल कर्मचाऱ्यांवर केला हल्ला
प्रचंड आगीमुळे आजूबाजूचा जंगलातील काही भाग, घरे आणि वाहनांनाही आग लागली. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यामुळेच स्थानिकांनी तेल कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांकडे नुकसान भरपाईची विनंती
त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी बोलून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सोनोवाल यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून घटनेची माहिती दिली. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी आणि एका सदस्याला नोकरी द्यावी अशी विनंती आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना केली होती, असे सोनोवाल यांनी सांगितले.
४ कर्मचाऱ्यांच्या पाण्यात उड्या, २ जणांचा मृत्यू
सोनोवाल माहिती देताना पुढे म्हणाले की, या भीषण आगीत चार तेल कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. त्यातील २ जणांचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेत आहोत, असे सोनोवाल म्हणाले.
अग्निशामक बंबासह लष्करी जवानही उपस्थित
दरम्यान, राज्यमंत्री चंद्र मोहन यांनी परिस्थितीची माहिती घेतली. तेलाची विहीर डिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यानाला लागूनच आहे. यामुळे वन क्षेत्र आणि रहिवासी भागाला धोका आहे. लोकांची घरे, वाहने, छोटी बाग आणि वनक्षेत्राचा काही भाग जळून खाक झाले आहेत. आम्ही नुकसानीची पाहणी करत आहोत, मात्र मोठ्या आगीमुळे आणि प्रचंड तापमानामुळे हे शक्य होत नाही, असे चंद्र मोहन म्हणाले. ओआयएल, आर्मी, एअरफोर्स, आयओसी आणि आसाम गॅस कंपनी, यांव्यतिरिक्त अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सिंगापूरहून येणार तज्ज्ञ
या ठिकाणी वेळेत तज्ज्ञ पोहोचावेत आणि परिस्थितीवर लवकरात नियंत्रण आणण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी विहिरीभोवती होणारी निदर्शने पाहता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्य सचिव आणि तीनसुकिया जिल्हा प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे, असे ऑईल इंडियाने सांगितले. ही परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सिंगापूर कंपनी 'अलर्ट डिजास्टर कंट्रोल' चे तज्ञ आणि सरकारी कंपनीचे तज्ञ घटनास्थळी पोचणार आहेत.
आगीवर नियंत्रण ठेवण्यास महिनाभराचा कालावधी लागेल
ही आग इतकी मोठी आणि भीषण आहे की, ती विझवण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो असे ऑईल इंडियाने स्पष्ट केले आहे. सोमवारपासून विहिरीवरील गॅस गळती थांबविण्यासाठी काम करणारे तीन सिंगापूरचे तज्ञ परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहेत. ही विहीर वाचवण्याचा ते प्रयत्न करतील असा आम्हाला विश्वास असल्याचे ऑईल इंडियाने निवेदनात म्हटले आहे. या निवेदनानुसार, संपूर्ण मोहिमेला चार आठवडे लागण्याची शक्यता आहे, परंतु तज्ञांचे पथक हा कालावधी कमी करण्यासाठी काम करीत आहेत.
या आगीनंतर अग्निशमन दलाचे दोन जवान बेपत्ता झाले होते, असे ऑइल इंडियाचे प्रवक्ते त्रिदिव हजारिका यांनी सांगितले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. बुधवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाने दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. दुरलोव गोगोई आणि ताकेश्वर गोहाईन अशी दोघांची ओळख पटली असून दोघेही कंपनीच्या अग्निशमन विभागात सहाय्यक ऑपरेटर आहेत. आग विझविण्याच्या प्रयत्नात ओएनजीसीच्या अग्निशमन दलाचा एक कर्मचारी किरकोळ भाजला आहे.
१५ दिवसांपासून होतेय गॅस गळती
येथे गेल्या १५ दिवसांपासून गॅसची अनियंत्रित गळती होत होती. त्यानंतर मंगळवारी इथे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांचे मृतदेह अग्निशमनस्थळाजवळील पाणी पसरलेल्या भागात सापडले, अशी माहिती त्रिदिव हजारिका यांनी दिली.
स्थानिक लोकांनी तेल कर्मचाऱ्यांवर केला हल्ला
प्रचंड आगीमुळे आजूबाजूचा जंगलातील काही भाग, घरे आणि वाहनांनाही आग लागली. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यामुळेच स्थानिकांनी तेल कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांकडे नुकसान भरपाईची विनंती
त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी बोलून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सोनोवाल यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून घटनेची माहिती दिली. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी आणि एका सदस्याला नोकरी द्यावी अशी विनंती आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना केली होती, असे सोनोवाल यांनी सांगितले.
४ कर्मचाऱ्यांच्या पाण्यात उड्या, २ जणांचा मृत्यू
सोनोवाल माहिती देताना पुढे म्हणाले की, या भीषण आगीत चार तेल कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. त्यातील २ जणांचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेत आहोत, असे सोनोवाल म्हणाले.
अग्निशामक बंबासह लष्करी जवानही उपस्थित
दरम्यान, राज्यमंत्री चंद्र मोहन यांनी परिस्थितीची माहिती घेतली. तेलाची विहीर डिब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यानाला लागूनच आहे. यामुळे वन क्षेत्र आणि रहिवासी भागाला धोका आहे. लोकांची घरे, वाहने, छोटी बाग आणि वनक्षेत्राचा काही भाग जळून खाक झाले आहेत. आम्ही नुकसानीची पाहणी करत आहोत, मात्र मोठ्या आगीमुळे आणि प्रचंड तापमानामुळे हे शक्य होत नाही, असे चंद्र मोहन म्हणाले. ओआयएल, आर्मी, एअरफोर्स, आयओसी आणि आसाम गॅस कंपनी, यांव्यतिरिक्त अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सिंगापूरहून येणार तज्ज्ञ
या ठिकाणी वेळेत तज्ज्ञ पोहोचावेत आणि परिस्थितीवर लवकरात नियंत्रण आणण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी विहिरीभोवती होणारी निदर्शने पाहता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्य सचिव आणि तीनसुकिया जिल्हा प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे, असे ऑईल इंडियाने सांगितले. ही परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सिंगापूर कंपनी 'अलर्ट डिजास्टर कंट्रोल' चे तज्ञ आणि सरकारी कंपनीचे तज्ञ घटनास्थळी पोचणार आहेत.
आगीवर नियंत्रण ठेवण्यास महिनाभराचा कालावधी लागेल
ही आग इतकी मोठी आणि भीषण आहे की, ती विझवण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो असे ऑईल इंडियाने स्पष्ट केले आहे. सोमवारपासून विहिरीवरील गॅस गळती थांबविण्यासाठी काम करणारे तीन सिंगापूरचे तज्ञ परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार आहेत. ही विहीर वाचवण्याचा ते प्रयत्न करतील असा आम्हाला विश्वास असल्याचे ऑईल इंडियाने निवेदनात म्हटले आहे. या निवेदनानुसार, संपूर्ण मोहिमेला चार आठवडे लागण्याची शक्यता आहे, परंतु तज्ञांचे पथक हा कालावधी कमी करण्यासाठी काम करीत आहेत.