नवी दिल्ली : आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांच्या सीमावादात सोमवारी मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात आसाम पोलिसांचे पाच जवान शहीद झाले तर ५० अधिक नागरिक जखमी झाले आहे. या हिंसाचारानंतर विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या निशाण्यावर घेतलंय. आसाममध्ये भाजपचं सरकार आहे तर मिझोरममध्ये भाजपप्रणित ईशान्य लोकशाही आघाडीत सहभागी असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटचं (MNF) सरकार आहे.
आसाम मिझोरम हिंसाचारानंतर 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
'मिझोरम - आसाम सीमेवर अचानक वाढलेल्या हिंसाचारात आसामचे सहा पोलीस शहीद झाले तर अनेक नागरिक जखमी झाले. २४-२५ जुलैचीच गोष्टी आहे की गृहमंत्र्यांनी ईशान्य भागाचा दौरा केला होता. जिथे त्यांनी मोदी सरकारच्या कौतुकाचे गोडवे गायले होते. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर लगेचच इतकी मोठी घटना कशी घडली?' असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केलाय.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही रोख गृहमंत्र्यांवर आहे. ही घटना म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांचं अपयश असल्याची टीका राहुल गांधी यांनी केलीय. तसंच त्यांच्यामुळेच नागरिकांमध्ये घृणा आणि अविश्वास निर्माण होत आहे, त्यामुळेच भारताला या परिस्थितीला तोंड द्यावं लागत असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शहिदांप्रती राहुल गांधी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी या हिंसाचाराचा एक व्हिडिओही जोडला आहे.
पुढच्या २४ तासांत 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी
अमित शहांचा पूर्व दौरा
उल्लेखनीय म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी पूर्वेकडील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून सीमा वाद सोडवण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच हिंसाचार घडून आला. या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा या दोघांनीही गृहमंत्र्यांशी वेगवेगळी चर्चा केली. यावेळी, अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना आंतरराज्यीय सीमेवर शांती कायम ठेवण्याचे निर्देश दिले.
आसाम - मिझोरमचा सीमावाद
आसामनं केलेल्या आरोपानुसार, मिझोरमच्या नागरिकांनी प्रथम गोळीबार केला तर मिझोरमचा आरोप आहे की आसाम पोलिसांच्या जवानांकडून सामान्य नागरिकांवर प्रथम गोळीबार करण्यात आला. आसामच्या बराक खोऱ्यातील जिल्हे - कछार, करीमगंज, हेलाकांडी आणि मिझोरमचे तीन जिल्हे आयजोल, कोलासिब आणि मामित या जिल्ह्यांची १६४ किलोमीटर लांब सीमा एकमेकांना जोडून आहे. या अगोदर ऑगस्ट २०२० मध्ये आणि फेब्रुवारी २०२१ मध्येही या आंतरराज्यीय सीमेवर हिंसाचार घडल्याचं समोर आलं होतं.
आसाम मिझोरम हिंसाचारानंतर 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
'मिझोरम - आसाम सीमेवर अचानक वाढलेल्या हिंसाचारात आसामचे सहा पोलीस शहीद झाले तर अनेक नागरिक जखमी झाले. २४-२५ जुलैचीच गोष्टी आहे की गृहमंत्र्यांनी ईशान्य भागाचा दौरा केला होता. जिथे त्यांनी मोदी सरकारच्या कौतुकाचे गोडवे गायले होते. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर लगेचच इतकी मोठी घटना कशी घडली?' असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केलाय.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही रोख गृहमंत्र्यांवर आहे. ही घटना म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांचं अपयश असल्याची टीका राहुल गांधी यांनी केलीय. तसंच त्यांच्यामुळेच नागरिकांमध्ये घृणा आणि अविश्वास निर्माण होत आहे, त्यामुळेच भारताला या परिस्थितीला तोंड द्यावं लागत असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शहिदांप्रती राहुल गांधी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी या हिंसाचाराचा एक व्हिडिओही जोडला आहे.
पुढच्या २४ तासांत 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी
अमित शहांचा पूर्व दौरा
उल्लेखनीय म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी पूर्वेकडील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून सीमा वाद सोडवण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच हिंसाचार घडून आला. या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा या दोघांनीही गृहमंत्र्यांशी वेगवेगळी चर्चा केली. यावेळी, अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना आंतरराज्यीय सीमेवर शांती कायम ठेवण्याचे निर्देश दिले.
आसाम - मिझोरमचा सीमावाद
आसामनं केलेल्या आरोपानुसार, मिझोरमच्या नागरिकांनी प्रथम गोळीबार केला तर मिझोरमचा आरोप आहे की आसाम पोलिसांच्या जवानांकडून सामान्य नागरिकांवर प्रथम गोळीबार करण्यात आला. आसामच्या बराक खोऱ्यातील जिल्हे - कछार, करीमगंज, हेलाकांडी आणि मिझोरमचे तीन जिल्हे आयजोल, कोलासिब आणि मामित या जिल्ह्यांची १६४ किलोमीटर लांब सीमा एकमेकांना जोडून आहे. या अगोदर ऑगस्ट २०२० मध्ये आणि फेब्रुवारी २०२१ मध्येही या आंतरराज्यीय सीमेवर हिंसाचार घडल्याचं समोर आलं होतं.