अ‍ॅपशहर

आसाममध्ये झाले ५९५ अर्ज दाखल

राज्यात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ५९५ इच्छुकांनी निवडणूक अर्ज दाखल केले आहेत. त्यात काँग्रेसचे नेते नीलमणी सेन देका, रकिबुल हुसेन आणि चंदन सरकार हे प्रमुख आहेत.

Maharashtra Times 24 Mar 2016, 2:34 am
गुवाहाटी : राज्यात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ५९५ इच्छुकांनी निवडणूक अर्ज दाखल केले आहेत. त्यात काँग्रेसचे नेते नीलमणी सेन देका, रकिबुल हुसेन आणि चंदन सरकार हे प्रमुख आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम assam poll
आसाममध्ये झाले ५९५ अर्ज दाखल


बुधवारी ६१ मतदारसंघांत ३८० जणांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी दिली. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अर्जांची छाननी गुरुवारी (२४ मार्च) होणार असून, अर्ज मागे घेण्याची मुदत २६पर्यंत आहे. पहिल्या टप्प्यात ४ एप्रिलला ६५ मतदारसंघांत मतदान होणार असून, त्यासाठी ५६१ उमेदवार रिंगणात आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज