अ‍ॅपशहर

अरुणाचल प्रदेशात आसाम रायफल्सच्या टीमवर हल्ला, जवानाचा मृत्यू

Arunachal Pradesh : बुधवारी पुन्हा एकदा अरुणाचलमध्ये संशयित दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती हाती येतेय. आसाम रायफल्सच्या पॅट्रोल टीमला या हल्ल्यात निशाण्यावर घेतलं गेलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Oct 2020, 3:55 pm
इटानगर : अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) आसाम रायफल्सच्या (Assam Rifles) पॅट्रोल टीमवर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. सोबतच आणखी काही जवान जखमीही झाल्याची माहिती हाती येतेय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आसाम रायफल्स, फाईल फोटो
आसाम रायफल्स, फाईल फोटो


हाती आलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या तीरप जिल्ह्यातील सैनलियम ट्राय - जंक्शनस्थित खोंसा लाजू रोडवर हा संशयित दहशतवादी हल्ला झालाय. हा भाग भारत - म्यानमार सीमेच्या काही अंतरावर आहे. हल्ल्यानंतर या भागात सुरक्षा यंत्रणेनं सर्च ऑपरेशन सुरू केलंय.

वाचा : कोश्यारींची 'लव्ह जिहाद'वर भेट, महिला आयोग अध्यक्ष रेखा शर्मा वादात
वाचा : नावडत्याचं मीठ अळणी! 'डिसलाईक' काही पंतप्रधानांची पाठ सोडेना


दीर्घकाळानंतर दहशतवादी हल्ला

अरुणाचलच्या सीमेवर दीर्घकाळाच्या शांततेनंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातील उत्तर - पूर्व भारतात सुरक्षादलाला आपला निशाणा बनवलं होतं. यावेळीही, म्यानमारशी लागून असलेल्या सीमेवर स्थित चांगलांग जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या जवानांनाच लक्ष्य बनवण्यात आलं होतं. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी घात लावून हा हल्ला घडवून आणण्यात आला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता तर आणखी एक जवान जखमी झाला होता. ही घटना जयरामपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या टेंगमो गावात घडली होती. राजधानी इटानगरपासून हा भाग जवळपास ३०० किलोमीटर दूर आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात दहशतवादविरोधी ऑपरेशनलाही सुरुवात केली होती.


वाचा : हाथरस: वाल्मिकी समाजाच्या ५० कुटुंबांनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा
वाचा : हाथरस गँगरेप : फॉरेन्सिक रिपोर्टवर प्रश्न; दोन डॉक्टरांनी गमावली नोकरी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज