मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
५ राज्यांमधील निवडणुकांदरम्यानच्या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक निकालानंतर मात्र औपचारिकतेचे दर्शन घडवले. आजच्या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयाबाबत शुभेच्छा दिल्या. तर, पंतप्रधान मोदी यांनी देखील राहुल गांधींचे ट्विट रिट्विट करत राहुल यांच्या शुभेच्छांचा खुल्या मनाने स्वीकार केला.
आपल्या ट्विटमध्ये राहुल म्हणाले, ' मी नरेंद्र मोदी आणि भाजपला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मिळालेल्या विजयाबाबत शुभेच्छा देतो.' त्यानंतर राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये पक्षाला मिळालेल्या विजयाबाबत कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. या बरोबरच त्यांनी पंजाबच्या जनतेचेही आवर्जून आभार मानले.
पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांच्या या ट्विटला तत्काळ रिट्विट करत म्हटले, ' धन्यवाद! लोकतंत्र चिरायू होवो.' यापूर्वी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंह यांना फोन करून पंजाबमध्ये मिळालेल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचंड बहुमत मिळाले, तर पंजाबमध्ये मात्र काँग्रेसने उत्तम कामगिरी करत सत्ता हस्तगत केली आहे.
५ राज्यांमधील निवडणुकांदरम्यानच्या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक निकालानंतर मात्र औपचारिकतेचे दर्शन घडवले. आजच्या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयाबाबत शुभेच्छा दिल्या. तर, पंतप्रधान मोदी यांनी देखील राहुल गांधींचे ट्विट रिट्विट करत राहुल यांच्या शुभेच्छांचा खुल्या मनाने स्वीकार केला.
आपल्या ट्विटमध्ये राहुल म्हणाले, ' मी नरेंद्र मोदी आणि भाजपला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मिळालेल्या विजयाबाबत शुभेच्छा देतो.' त्यानंतर राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये पक्षाला मिळालेल्या विजयाबाबत कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. या बरोबरच त्यांनी पंजाबच्या जनतेचेही आवर्जून आभार मानले.
पंतप्रधान मोदी यांनी राहुल यांच्या या ट्विटला तत्काळ रिट्विट करत म्हटले, ' धन्यवाद! लोकतंत्र चिरायू होवो.' यापूर्वी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंह यांना फोन करून पंजाबमध्ये मिळालेल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचंड बहुमत मिळाले, तर पंजाबमध्ये मात्र काँग्रेसने उत्तम कामगिरी करत सत्ता हस्तगत केली आहे.