गुरूग्राम (हरियाणा) - हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी देशात उपस्थित करण्यात आलेला राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनसीआर) आणि घुसखोरीचा मुद्दा आता खऱ्या अर्थानं राजकीय मुद्दा बनला आहे. काँग्रेसने घुसखोरांबद्दल एक शब्दही काढला नाही, असा आरोप करीत राहुल गांधी यांनी कितीही विरोध केला तरी २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घुसखोरांना हाकलून लावण्यात येणार असल्याचा पुनरूच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुन्हा एकदा केला.
हरियाणा निवडणुकीतील प्रचारानिमित्त अमित शहा यांची आज गुरुग्राममध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. देशातील घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत हाकलण्यात येणार आहे, याबद्दल राहुल गांधी हे काहीच बोलत नाही. राहुल गांधी , हुड्डा यांना यावर आक्षेप घेऊ द्या. पण, मी तुम्हाला आश्वासन देतो की, २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घुसखोरांना देशातून हाकलण्यात येईल, असे अमित शहा यांनी म्हटले. गुरूग्राममधील रॅलीच्या आधी अमित शहा यांनी पानीपत येथे झालेल्या सभेतही काँग्रेसवर एनआरसीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. ज्यावेळी भाजप देशातील घुसखोरांना हाकलून लावण्याचे बोलते. त्यावेळी काँग्रेस यावर आक्षेप घेते, त्यांना तुम्ही बाहेर का काढत आहात, असे म्हणत आहे. ते कुठे जाणार?, ते काय खाणार?, असा काँग्रेसला प्रश्न पडला आहे. माझा काँग्रेसला एक सवाल आहे. देशातील घुसखोर हे तुमचे मावस भाऊ आहेत का?, अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
काश्मीरमधील ३७० हे देशासाठी दहशतवादाचे कारण बनले होते. ते काश्मीरच्या विकासासाठी आडकाठी बनले होते. नरेंद्र मोदी सरकारने ते कलम हटवण्याचे काम केले. जम्मू-काश्मीरमधील आधीच्या सरकारवरही अमित शहा यांनी टीका केली. काश्मीरच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये पाठवले जात होते. परंतु, कलम ३७० असल्याने राज्याचा विकास होऊ शकला नाही. त्या ठिकाणी काँग्रेसच्या १० वर्षाच्या सत्ताकाळात पाकिस्तानहून आलेले दहशतवादी भारतात दहशतवाद पसरवत होते. परंतु, पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. ज्यावेळी केंद्रात भाजपचे सरकार आले. त्यावेळी आपल्या जवानाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी स्थळावर सर्जिकल स्ट्राइक केला. व त्यांचा खात्मा केला, असेही शहा यावेळी म्हणाले.
हरियाणा निवडणुकीतील प्रचारानिमित्त अमित शहा यांची आज गुरुग्राममध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. देशातील घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत हाकलण्यात येणार आहे, याबद्दल राहुल गांधी हे काहीच बोलत नाही. राहुल गांधी , हुड्डा यांना यावर आक्षेप घेऊ द्या. पण, मी तुम्हाला आश्वासन देतो की, २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घुसखोरांना देशातून हाकलण्यात येईल, असे अमित शहा यांनी म्हटले. गुरूग्राममधील रॅलीच्या आधी अमित शहा यांनी पानीपत येथे झालेल्या सभेतही काँग्रेसवर एनआरसीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. ज्यावेळी भाजप देशातील घुसखोरांना हाकलून लावण्याचे बोलते. त्यावेळी काँग्रेस यावर आक्षेप घेते, त्यांना तुम्ही बाहेर का काढत आहात, असे म्हणत आहे. ते कुठे जाणार?, ते काय खाणार?, असा काँग्रेसला प्रश्न पडला आहे. माझा काँग्रेसला एक सवाल आहे. देशातील घुसखोर हे तुमचे मावस भाऊ आहेत का?, अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
काश्मीरमधील ३७० हे देशासाठी दहशतवादाचे कारण बनले होते. ते काश्मीरच्या विकासासाठी आडकाठी बनले होते. नरेंद्र मोदी सरकारने ते कलम हटवण्याचे काम केले. जम्मू-काश्मीरमधील आधीच्या सरकारवरही अमित शहा यांनी टीका केली. काश्मीरच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये पाठवले जात होते. परंतु, कलम ३७० असल्याने राज्याचा विकास होऊ शकला नाही. त्या ठिकाणी काँग्रेसच्या १० वर्षाच्या सत्ताकाळात पाकिस्तानहून आलेले दहशतवादी भारतात दहशतवाद पसरवत होते. परंतु, पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. ज्यावेळी केंद्रात भाजपचे सरकार आले. त्यावेळी आपल्या जवानाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी स्थळावर सर्जिकल स्ट्राइक केला. व त्यांचा खात्मा केला, असेही शहा यावेळी म्हणाले.