अ‍ॅपशहर

धर्मनिरपेक्षता संपवण्याचा केंद्राचा प्रयत्न!

देशात सध्या सांप्रदायिक लोकांची ताकद वाढलेली पाहायला मिळत आहे. देश नाजुक परिस्थितीतून जात आहे. धर्मनिरपेक्षतेला निशाणा बनवला जात आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

Maharashtra Times 12 Mar 2016, 9:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम attacks on sangh parivar during the seminar of jamiat ulema e hind
धर्मनिरपेक्षता संपवण्याचा केंद्राचा प्रयत्न!


देशात सध्या सांप्रदायिक लोकांची ताकद वाढलेली पाहायला मिळत आहे. देश नाजूक परिस्थितीतून जात आहे. धर्मनिरपेक्षतेला निशाणा बनवला जात आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. जमीयत-उलेमा-ए-हिंद या संघटनेद्वारे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता संमेलनात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांचे पत्र वाचून दाखवले.

जसे तुम्ही सारे धर्मनिरपेक्षतेसाठी लढत आहात तसेच सोनिया गांधी संसदेत लढत आहेत, असेही सोनिया गांधी यांच्या संदेशात म्हटले होते. या पत्राचे वैशिष्ट्य म्हणजे सोनिया गांधींनी पत्राच्या शेवटी उर्दू भाषेतून स्वाक्षरी केल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

या कार्यक्रमात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते मोहम्मद सलीम यांनी देखील केंद्रावर हल्ला चढवला. जेएनयूमधील घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, ‘नथुरामचे वारसदार आमच्याकडे देशभक्तीचे प्रमाणपत्र मागताहेत. यांच्या मुखात रामनाम आणि काखेत नथुराम आहे. संघ परिवार मुस्लिम, ख्रिश्चन आणि मार्क्सवाद्यांचा द्वेष करतो. हे लोक धर्मनिरपेक्षतेसह लोकशाहीला देखील संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. या द्वेषाच्या आगीत आम्ही भारताला भस्म होऊ देणार नाही.’

या कार्यक्रमात जमीयतचे अध्यक्ष अरशद मदनी आणि महसूद मदनी यांच्यासह उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहिद मंजूर, काँग्रेस प्रवक्ते मीम अफजल आणि नवाब महमूद असे अनेक लोक आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज