नवी दिल्ली: अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यात मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजीव धवन यांना या खटल्यातून वगळण्यात आलं आहे. खुद्द धवन यांनीच फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालाविरुद्ध कालच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. जमियत-उलेमा-ए हिंद या मुस्लिम संघटनेने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत प्रामुख्याने बाबरी मशिदीच्या पतनाबाबत सुप्रीम कोर्टाने केलेल्या टिपण्णीवर बोट ठेवण्यात आले आहे.
याचिका दाखल केल्यानंतर आज लगेचच 'जमियत'नं धवन यांना खटल्यातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. 'जमियत'ची बाजू मांडणारे वकील एजाज मकबूल यांनी तसं पत्र धवन यांना पाठवलं आहे. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदानी यांनी दिली, असं धवन यांनी सांगितलं. 'कुठलाही कल्पना न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निव्वळ मूर्खपणा आहे,' असा संताप धवन यांनी व्यक्त केला आहे.
खरंतर, मुस्लिम पक्षकारांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत माझा सहभाग नव्हता,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'मला खटल्यातून वगळण्याचा अधिकार मदानी यांना आहे. ते तशा सूचना मुख्य वकिलांना करू शकतात. मात्र, त्यासाठी जे कारण देण्यात आलं आहे, ते अत्यंत चुकीचं आणि खोडसाळ आहे,' असं धवन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अयोध्या निकाल: सुप्रीम कोर्टात 'जमियत'ची पुनर्विचार याचिका
रामजन्मभूमी खटल्यात धवन यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठापुढं मुस्लिम पक्षकारांची बाजू जोरकसपणे मांडली होती. तब्बल ४० दिवस चाललेल्या सुनावणीपैकी दोन आठवडे धवन यांनी युक्तिवाद केला होता.
तीन आठवड्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी निकाल दिला होता. त्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह काही संस्थानी या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यावर विचारविनिमय केला जात असल्याचे सांगितले होते. ६ डिसेंबर या दिवशी बाबरीचे पतन झाले होते. तो दिवस साधून येत्या ६ डिसेंबर रोजी याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र, त्याआधीच जमियतने आज पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
अयोध्या: 'पुनर्विचार याचिकेमुळे मुस्लिमांचं नुकसानच होईल'
अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालाविरुद्ध कालच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. जमियत-उलेमा-ए हिंद या मुस्लिम संघटनेने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत प्रामुख्याने बाबरी मशिदीच्या पतनाबाबत सुप्रीम कोर्टाने केलेल्या टिपण्णीवर बोट ठेवण्यात आले आहे.
याचिका दाखल केल्यानंतर आज लगेचच 'जमियत'नं धवन यांना खटल्यातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. 'जमियत'ची बाजू मांडणारे वकील एजाज मकबूल यांनी तसं पत्र धवन यांना पाठवलं आहे. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदानी यांनी दिली, असं धवन यांनी सांगितलं. 'कुठलाही कल्पना न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निव्वळ मूर्खपणा आहे,' असा संताप धवन यांनी व्यक्त केला आहे.
खरंतर, मुस्लिम पक्षकारांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेत माझा सहभाग नव्हता,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'मला खटल्यातून वगळण्याचा अधिकार मदानी यांना आहे. ते तशा सूचना मुख्य वकिलांना करू शकतात. मात्र, त्यासाठी जे कारण देण्यात आलं आहे, ते अत्यंत चुकीचं आणि खोडसाळ आहे,' असं धवन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अयोध्या निकाल: सुप्रीम कोर्टात 'जमियत'ची पुनर्विचार याचिका
रामजन्मभूमी खटल्यात धवन यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठापुढं मुस्लिम पक्षकारांची बाजू जोरकसपणे मांडली होती. तब्बल ४० दिवस चाललेल्या सुनावणीपैकी दोन आठवडे धवन यांनी युक्तिवाद केला होता.
तीन आठवड्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी निकाल दिला होता. त्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह काही संस्थानी या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यावर विचारविनिमय केला जात असल्याचे सांगितले होते. ६ डिसेंबर या दिवशी बाबरीचे पतन झाले होते. तो दिवस साधून येत्या ६ डिसेंबर रोजी याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र, त्याआधीच जमियतने आज पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
अयोध्या: 'पुनर्विचार याचिकेमुळे मुस्लिमांचं नुकसानच होईल'