नवी दिल्ली :
अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने पाच न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं असून या घटनापीठापुढे १० जानेवारीपासून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठात एस. ए. बोबडे, एन. व्ही. रामन, उदय उमेश ललित, डीय. वाय चंद्रचूड या न्यायाधीशांचा समावेश असणार आहे.
दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबाबत लवकरात लवकर निवाडा करण्याची सर्वच पक्षकारांची विनंती आहे. ही बाब लक्षात घेऊन ६ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठ नेमण्यात येईल, असे नमूद केले होते. त्यानुसार आज घटनापीठ स्थापन करण्यात आले असून या पीठापुढे आता १० जानेवारीपासून अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने पाच न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलं असून या घटनापीठापुढे १० जानेवारीपासून या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठात एस. ए. बोबडे, एन. व्ही. रामन, उदय उमेश ललित, डीय. वाय चंद्रचूड या न्यायाधीशांचा समावेश असणार आहे.
दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबाबत लवकरात लवकर निवाडा करण्याची सर्वच पक्षकारांची विनंती आहे. ही बाब लक्षात घेऊन ६ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठ नेमण्यात येईल, असे नमूद केले होते. त्यानुसार आज घटनापीठ स्थापन करण्यात आले असून या पीठापुढे आता १० जानेवारीपासून अयोध्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.