अ‍ॅपशहर

भाजपचे श्रद्धेच्या राजकारणाचे दरवाजे बंद झाले: काँग्रेस

'अयोध्या प्रकरणाच्या निकालामुळं राम मंदिराचे दरवाजे खुले झाले, हे खरेच आहे. मात्र, त्याचबरोबर या निकालामुळं सत्तेच्या भोगासाठी श्रद्धेचं राजकारण करण्याचे मार्ग बंद झाले आहेत,' अशी मार्मिक प्रतिक्रिया काँग्रेसनं अयोध्या निकालानंतर दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2019, 8:21 pm

अयोध्येत राम मंदिरच; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली: 'अयोध्या प्रकरणाच्या निकालामुळं राम मंदिराचे दरवाजे खुले झाले, हे खरेच आहे. मात्र, त्याचबरोबर या निकालामुळं सत्तेच्या भोगासाठी श्रद्धेचं राजकारण करण्याचे मार्ग बंद झाले आहेत,' अशी मार्मिक प्रतिक्रिया काँग्रेसनं अयोध्या निकालानंतर दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Surjewala



गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल न्यायालयानं दिला आहे. या निकालामुळे वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली.

सुप्रीम कोर्टाचा निकाल असमाधानकारक: जिलानी

'अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा काँग्रेस सन्मान करते. हा निकाल एक प्रकारे श्रद्धा व विश्वासाचाही सन्मान आहे. सर्व समाजघटकांनी न्यायालयाचा निकाल मान्य करून शांतता राखावी. देशातील परस्पर सौहार्द व एकतेची परंपरा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे,' अशी अपेक्षा सुरजेवाला यांनी व्यक्त केली. 'रामजन्मभूमीच्या निर्णयाचं श्रेय कुठलीही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेनं घेण्याचा प्रश्नच येत नाही,' असंही ते म्हणाले.

'या निर्णयामुळं राम मंदिरांचे दरवाजे खुले झाले आहेत. तसंच, सत्तेच्या भोगासाठी देशाच्या आस्थेशी खेळण्याचे भाजपसारख्या अनेकांचे दरवाजे बंद झाले आहेत. कारण, राम हा त्यागाचं प्रतीक होता, सत्तेच्या भोगाचं नव्हे,' असं सुरजेवाला म्हणाले.

अयोध्या खटला: 'असा' लागला निकाल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज