लखनौ : अयोध्या वादावर कोणत्याही क्षणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी काळजी घेतली जात आहे. पोलिसांकडून जवळपास १६५९ सोशल मीडिया अकाऊंट्सवर नजर ठेवली जात आहे, शिवाय गरज पडल्यास इंटरनेट सेवाही बंद केली जाऊ शकते, अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’शी बोलताना दिली. 'कोणत्याही परिस्थितीत शांतता कायम राहिली पाहिजे,' असे स्पष्ट निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचं ओपी सिंह यांनी सांगितलं. ‘पोलिसांकडून पायी गस्त घातली जात आहे. जिल्हाधिकारी धर्मगुरुंशी बैठका करत आहेत. गेल्या काही दिवसात शांततेसाठी सहा हजार बैठका घेतल्या असून ५८०० धर्मगुरुंची भेट घेतली. आम्ही सैन्य आणि वायूसेनेच्याही संपर्कात आहोत,’ अशी माहिती ओपी सिंह यांनी दिली.
वाचा : रामजन्मभूमी-बाबरी मशीद निकालाआधी अयोध्या सज्ज
‘पोलिसांच्या रडारवर आतापर्यंत १० हजार जण असून त्यांना सीआरपीसी अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे, जेणेकरुन त्यांनी शांतता भंग करु नये. यापैकी ४५० जणांना तुरुंगातही पाठवण्यात आलं आहे. गस्त घालण्यासोबतच सर्वात जास्त नजर सोशल मीडियावर आहे आणि यासाठी एक विशेष पथक कामाला लावण्यात आलं आहे. आतापर्यंत १६५९ अकाऊंट्स निगराणीत ठेवण्यात आले आहेत, ज्याद्वारे सामाजिक शांतता भंग केली जाऊ शकते,’ अशी माहितीही ओपी सिंह यांनी दिली.
‘गरज पडल्यास इंटरनेट सेवा बंद’
गरज भासल्यास इंटरनेट सेवाही बंद केली जाईल, असं ओपी सिंह यांनी स्पष्ट केलं. तूर्तास अशी कोणतीही आवश्यकता नसल्याचं त्यांनी सांगितलं. अयोध्येसह काही संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून पोलिसांकडून प्रत्येकाची तपासणी होत आहे, असं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात गर्दी आणि अफवा रोखणं याला पोलिसांचं प्राधान्य असल्याचं ओपी सिंह म्हणाले. निमलष्करी तुकड्यांची मागणी केली असून ४० तुकड्या दाखल झाल्या आहेत, आणखी ७० तुकड्यांची आवश्यकता आहे. पोलिसांव्यतिरिक्त या तुकड्यांचं काम सुरु असेल, अशी माहितीही ओपी सिंह यांनी दिली.
वाचा : अयोध्याप्रकरणी कोर्टाचा निर्णय मान्य असेल: मुस्लिम धर्मगुरू
पोलिसांसमोर दुहेरी आव्हान असल्याचंही पोलीस महासंचालकांनी सांगितलं. कारण, ‘अयोध्येत सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. अयोध्येत सध्या पंचक्रोशी परिक्रमा सुरु आहे. १० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि ११ ते १३ नोव्हेंबरपर्यंत कार्तिक पौर्णिमा यात्रा आहे, ज्यात भाविक शरयू नदीच्या किनाऱ्यावर स्नान करतात. या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि शांततापूर्ण पद्धतीने हे पार पडेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाचा : रामजन्मभूमी-बाबरी मशीद निकालाआधी अयोध्या सज्ज
‘पोलिसांच्या रडारवर आतापर्यंत १० हजार जण असून त्यांना सीआरपीसी अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे, जेणेकरुन त्यांनी शांतता भंग करु नये. यापैकी ४५० जणांना तुरुंगातही पाठवण्यात आलं आहे. गस्त घालण्यासोबतच सर्वात जास्त नजर सोशल मीडियावर आहे आणि यासाठी एक विशेष पथक कामाला लावण्यात आलं आहे. आतापर्यंत १६५९ अकाऊंट्स निगराणीत ठेवण्यात आले आहेत, ज्याद्वारे सामाजिक शांतता भंग केली जाऊ शकते,’ अशी माहितीही ओपी सिंह यांनी दिली.
‘गरज पडल्यास इंटरनेट सेवा बंद’
गरज भासल्यास इंटरनेट सेवाही बंद केली जाईल, असं ओपी सिंह यांनी स्पष्ट केलं. तूर्तास अशी कोणतीही आवश्यकता नसल्याचं त्यांनी सांगितलं. अयोध्येसह काही संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून पोलिसांकडून प्रत्येकाची तपासणी होत आहे, असं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात गर्दी आणि अफवा रोखणं याला पोलिसांचं प्राधान्य असल्याचं ओपी सिंह म्हणाले. निमलष्करी तुकड्यांची मागणी केली असून ४० तुकड्या दाखल झाल्या आहेत, आणखी ७० तुकड्यांची आवश्यकता आहे. पोलिसांव्यतिरिक्त या तुकड्यांचं काम सुरु असेल, अशी माहितीही ओपी सिंह यांनी दिली.
वाचा : अयोध्याप्रकरणी कोर्टाचा निर्णय मान्य असेल: मुस्लिम धर्मगुरू
पोलिसांसमोर दुहेरी आव्हान असल्याचंही पोलीस महासंचालकांनी सांगितलं. कारण, ‘अयोध्येत सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. अयोध्येत सध्या पंचक्रोशी परिक्रमा सुरु आहे. १० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि ११ ते १३ नोव्हेंबरपर्यंत कार्तिक पौर्णिमा यात्रा आहे, ज्यात भाविक शरयू नदीच्या किनाऱ्यावर स्नान करतात. या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि शांततापूर्ण पद्धतीने हे पार पडेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.