वृत्तसंस्था, नवी दिल्ली
१९९२मधील बाबरी मशिद पतनानंतर तसेच २००२च्या गोध्रा दंगलीनंतरच भारतीय युवक मोठ्या संख्येने जिहादकडे वळले, असा दावा दिल्ली पोलिसांनी स्थानिक न्यायालयात केला आहे. देशात दहशतवादी कारवायांचा कट रचण्यासाठी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवलेल्या १७ जणांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी हे नमूद केले आहे.
पोलिसांनी अटक केलेला सय्यद अनझर शाह याने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी मोहम्मद उमर याची भेट घेतली होती. यावेळी भारतात मुस्लिमांवर होत असल्याच्या कथित अत्याचारावर चर्चा झाली. उमरच्या विचारांनी प्रेरित होऊन सय्यदने जिहादसाठी काम करण्याचा निर्धार केला व पाकमध्ये शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रकरणातील अब्दुल रेहमान याने पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदचे दहशतवादी सलिम मन्सूर आणि सज्जाद यांना उत्तर प्रदेशात आश्रय मिळवून दिला होता. हे तिघेही बाबरीपतनाचा सूड उगवण्यासाठी अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट आखत होते. मात्र पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाकचे दोन दहशतवादी ठार झाले होते. आरोपपत्र ठेवलेल्या १७ जणांपैकी १२ जण फरार असून, मोहम्मद असिफ, झफर मसूद, मोहम्मद अब्दुल रेहमान, सय्यद अनझर शाह व अब्दुल सामी यांच्याविरुद्ध पोलिसांनी हे आरोपपत्र सादर केले आहे. या सर्वांवर देशविघातक कारवाया केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अल कायदा भारतात तळ उभारण्याच्या प्रयत्नात असताना या सर्वांनी दहशतवाद्यांना आश्रय मिळवून देण्यात मदत केली. हे सर्व आरोपी पाक, इराण आणि तुर्कस्तानातील दहशतवादी गटांशी सोशल मीडिया तसेच मोबाइल फोनवरून संपर्कात होते. त्यांनी अल कायदाच्या गटाला आर्थिक रसद पुरवून देण्यातही मदत केली, शिवाय भारतातील युवकांना जिहादसाठीही भडकवले. तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्यासाठी बाबरी मशिदपतन व गोध्राकांडाचा हवाला देत जिहादची हाक दिली जात होती, असे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.
१९९२मधील बाबरी मशिद पतनानंतर तसेच २००२च्या गोध्रा दंगलीनंतरच भारतीय युवक मोठ्या संख्येने जिहादकडे वळले, असा दावा दिल्ली पोलिसांनी स्थानिक न्यायालयात केला आहे. देशात दहशतवादी कारवायांचा कट रचण्यासाठी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवलेल्या १७ जणांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी हे नमूद केले आहे.
पोलिसांनी अटक केलेला सय्यद अनझर शाह याने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी मोहम्मद उमर याची भेट घेतली होती. यावेळी भारतात मुस्लिमांवर होत असल्याच्या कथित अत्याचारावर चर्चा झाली. उमरच्या विचारांनी प्रेरित होऊन सय्यदने जिहादसाठी काम करण्याचा निर्धार केला व पाकमध्ये शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रकरणातील अब्दुल रेहमान याने पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदचे दहशतवादी सलिम मन्सूर आणि सज्जाद यांना उत्तर प्रदेशात आश्रय मिळवून दिला होता. हे तिघेही बाबरीपतनाचा सूड उगवण्यासाठी अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट आखत होते. मात्र पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाकचे दोन दहशतवादी ठार झाले होते. आरोपपत्र ठेवलेल्या १७ जणांपैकी १२ जण फरार असून, मोहम्मद असिफ, झफर मसूद, मोहम्मद अब्दुल रेहमान, सय्यद अनझर शाह व अब्दुल सामी यांच्याविरुद्ध पोलिसांनी हे आरोपपत्र सादर केले आहे. या सर्वांवर देशविघातक कारवाया केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अल कायदा भारतात तळ उभारण्याच्या प्रयत्नात असताना या सर्वांनी दहशतवाद्यांना आश्रय मिळवून देण्यात मदत केली. हे सर्व आरोपी पाक, इराण आणि तुर्कस्तानातील दहशतवादी गटांशी सोशल मीडिया तसेच मोबाइल फोनवरून संपर्कात होते. त्यांनी अल कायदाच्या गटाला आर्थिक रसद पुरवून देण्यातही मदत केली, शिवाय भारतातील युवकांना जिहादसाठीही भडकवले. तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्यासाठी बाबरी मशिदपतन व गोध्राकांडाचा हवाला देत जिहादची हाक दिली जात होती, असे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.