केंद्रीय आरोग्य विभागाचे निर्देश
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
संपूर्ण गुटखाबंदीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत निकोटीन किंवा तंबाखू असलेले सर्व प्रकाराचे पान मसाले आणि तत्सम मिश्रणांवर राज्यांनी संपूर्ण बंदी घालावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य विभागाने गुरुवारी दिले आहेत. ही उत्पादने स्वतंत्रपणे किंवा अन्य घटकांसोबत मिश्रण म्हणून विकली जात असतील तरीही ही बंदी लागू असेल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबरला दिलेल्या निर्देशांनुसार राज्य सरकारांनी आवश्यक ते आदेश काढावेत आणि गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि अन्य तत्सम मिश्रणांचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण यांवर तातडीने बंदी घालावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
संबंधित उत्पादनामध्ये तंबाखू किंवा निकोटीन असेल, मग त्याचे नाव काहीही असो, तो पॅकबंद स्वरूपात अथवा सुट्या रूपात विकला जात असेल आणि तो ग्राहकाला सहज उपलब्ध होत असेल, तर हे तातडीने बंद व्हायला हवे अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव सी. के मिश्रा यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात दिल्या आहेत. बिहार, कर्नाटक, मिझोराम, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार यापूर्वीच या संदर्भात आदेश काढले असल्याचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे.
ग्लोबल ऑडिट टोबॅको सर्व्हे, इंडिया, २०१० नुसार तंबाखूसेवन हे जगभरात तसेच भारतात मृत्यू आणि गंभीर आजारांचे कारण राहिले आहे. २० कोटींहून अधिक लोक तंबाखूसेवन करते त्यात च्युइंगम आणि धूरविरहित तंबाखू यांची नव्याने भर पडली आहे. जगात सर्वाधिक तोंडाचा कॅन्सर झालेले रुग्ण भारतात आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
‘गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू अशा नावांखाली विकली जाणारी उत्पादने पुष्कळदा एकाच दुकानात, एकाच विक्रेत्याकडे उपलब्ध असतात. ‘खाण्यासाठी तयार’च्या नावाखाली तंबाखू कंपन्या आता वेगवेगळी मिश्रणे करून जोड पाकिटांमध्ये विकत आहेत,’ असेही पत्रात म्हटले आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
संपूर्ण गुटखाबंदीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत निकोटीन किंवा तंबाखू असलेले सर्व प्रकाराचे पान मसाले आणि तत्सम मिश्रणांवर राज्यांनी संपूर्ण बंदी घालावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य विभागाने गुरुवारी दिले आहेत. ही उत्पादने स्वतंत्रपणे किंवा अन्य घटकांसोबत मिश्रण म्हणून विकली जात असतील तरीही ही बंदी लागू असेल, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबरला दिलेल्या निर्देशांनुसार राज्य सरकारांनी आवश्यक ते आदेश काढावेत आणि गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि अन्य तत्सम मिश्रणांचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण यांवर तातडीने बंदी घालावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
संबंधित उत्पादनामध्ये तंबाखू किंवा निकोटीन असेल, मग त्याचे नाव काहीही असो, तो पॅकबंद स्वरूपात अथवा सुट्या रूपात विकला जात असेल आणि तो ग्राहकाला सहज उपलब्ध होत असेल, तर हे तातडीने बंद व्हायला हवे अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव सी. के मिश्रा यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात दिल्या आहेत. बिहार, कर्नाटक, मिझोराम, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार यापूर्वीच या संदर्भात आदेश काढले असल्याचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे.
ग्लोबल ऑडिट टोबॅको सर्व्हे, इंडिया, २०१० नुसार तंबाखूसेवन हे जगभरात तसेच भारतात मृत्यू आणि गंभीर आजारांचे कारण राहिले आहे. २० कोटींहून अधिक लोक तंबाखूसेवन करते त्यात च्युइंगम आणि धूरविरहित तंबाखू यांची नव्याने भर पडली आहे. जगात सर्वाधिक तोंडाचा कॅन्सर झालेले रुग्ण भारतात आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
‘गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू अशा नावांखाली विकली जाणारी उत्पादने पुष्कळदा एकाच दुकानात, एकाच विक्रेत्याकडे उपलब्ध असतात. ‘खाण्यासाठी तयार’च्या नावाखाली तंबाखू कंपन्या आता वेगवेगळी मिश्रणे करून जोड पाकिटांमध्ये विकत आहेत,’ असेही पत्रात म्हटले आहे.