नवी दिल्ली : नव्याने कोणत्याही कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास सहा महिन्यांची स्थगिती देणारी सुधारणा करणारा वटहुकूम केंद्र सरकारने शुक्रवारी काढला. लॉकडाउनमुळे आर्थिक वंचनेत सापडलेल्या अनेक उद्योगांना या सुधारणेमुळे दिलासा मिळणार आहे. २५ मार्च अथवा त्यानंतर थकीत झालेली कर्जे यापुढे किमान सहा महिने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी पात्र समजली जाणार नाहीत, असे या वटहुकुमात म्हटले आहे.
दिवाळखोरी प्रक्रियांना सहा महिने स्थगिती
नव्याने कोणत्याही कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यास सहा महिन्यांची स्थगिती देणारी सुधारणा करणारा वटहुकूम केंद्र सरकारने शुक्रवारी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2020, 4:00 am