वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताविरुद्धच्या पराभवानंतर, पाकिस्तानामध्ये टिकेचे लक्ष्य झालेल्या शाहीद आफ्रिदीच्या काश्मीरच्या मुद्द्यावरील वक्तव्याचा भारतीयांकडूनही खरपूस समाचार घेण्यात येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघाच्या समर्थनार्थ काश्मिरी नागरिक आले होते, असा जावईशोध आफ्रिदीला लागला होता.
टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आणि वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाची मालिका कायम ठेवली. त्यामुळे शाहीद आफ्रिदीविरोधात पाकिस्तानात मोठा रोष आहे. त्यातच, या स्पर्धेनंतर त्याची कर्णधारपदावरून गच्छंती करणार असल्याचेही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने जाहीर केले आहे. त्यातच, आफ्रिदीने आता नवा वाद ओढवून घेतला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना शाहीद आफ्रिदीने हे वक्तव्य केले होते. त्यानंतर, भारतीय प्रसारमाध्यमांनी आफ्रिदीला लक्ष्य करताना, तो चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचेही म्हटले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनीही आफ्रिदीवर टीका केली आहे. ‘अशा पद्धतीने राजकीय विधान करणे योग्य होणार नाही. खेळाडूंनी राजकीय वादापासून दूर राहणे गरजेचे आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, भारतामध्ये आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, आम्ही राजकीय विधान करणार नाही, असे आफ्रिदीने म्हटले होते.
दरम्यान, आफ्रिदीने टी-२० प्रकारातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले असून, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अखेरचा असेल, असेही त्याने अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. ‘भारतामध्ये पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळते,’ असे स्पर्धेपूर्वी आफ्रिदीने म्हटले होते. त्यानंतरच्या वातावरणामुळेच आफ्रिदी निवृत्तीची भाषा करत असल्याचे सांगितले जात आहे.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर, पाकिस्तानामध्ये टिकेचे लक्ष्य झालेल्या शाहीद आफ्रिदीच्या काश्मीरच्या मुद्द्यावरील वक्तव्याचा भारतीयांकडूनही खरपूस समाचार घेण्यात येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघाच्या समर्थनार्थ काश्मिरी नागरिक आले होते, असा जावईशोध आफ्रिदीला लागला होता.
टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला आणि वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाची मालिका कायम ठेवली. त्यामुळे शाहीद आफ्रिदीविरोधात पाकिस्तानात मोठा रोष आहे. त्यातच, या स्पर्धेनंतर त्याची कर्णधारपदावरून गच्छंती करणार असल्याचेही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने जाहीर केले आहे. त्यातच, आफ्रिदीने आता नवा वाद ओढवून घेतला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना शाहीद आफ्रिदीने हे वक्तव्य केले होते. त्यानंतर, भारतीय प्रसारमाध्यमांनी आफ्रिदीला लक्ष्य करताना, तो चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचेही म्हटले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनीही आफ्रिदीवर टीका केली आहे. ‘अशा पद्धतीने राजकीय विधान करणे योग्य होणार नाही. खेळाडूंनी राजकीय वादापासून दूर राहणे गरजेचे आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, भारतामध्ये आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, आम्ही राजकीय विधान करणार नाही, असे आफ्रिदीने म्हटले होते.
दरम्यान, आफ्रिदीने टी-२० प्रकारातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले असून, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना अखेरचा असेल, असेही त्याने अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. ‘भारतामध्ये पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळते,’ असे स्पर्धेपूर्वी आफ्रिदीने म्हटले होते. त्यानंतरच्या वातावरणामुळेच आफ्रिदी निवृत्तीची भाषा करत असल्याचे सांगितले जात आहे.