नवी दिल्ली : दिल्लीमोबाइल फोनच्या माध्यमातून संसद सदस्यांनी सर्वसामान्य जनतेशी संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे सांगून आगामी लोकसभा निवडणूक मोबाइल फोनवर लढली जाईल, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी खासदारांना दिल्याचे समजते. देशात स्मार्ट फोनचा सर्वत्र वापर होत असल्यामुळे संसद सदस्यांनी २०१९ची लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी या अस्त्राचा व्यापक आणि परिणामकारकपणे उपयोग करण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘७, लोककल्याण मार्ग’ येथे शुक्रवारी सकाळी मोदी यांनी झारखंड, कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांतील भाजपच्या संसद सदस्यांशी संवाद साधला. आपण मोबाइलच्या माध्यमातून फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात आहोत. तुम्हीही अशाच पद्धतीने मोबाइलचा जास्तीत जास्त वापर करून जनतेशी संपर्कात राहा आणि त्यांचे प्रश्न सोडवा, असा सल्ला मोदी यांनी या खासदारांना दिला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धात पंतप्रधान मोदी गेल्या काही दिवसांपासून सकाळी भाजपच्या विविध राज्यांतील खासदारांना गटागटांनी चहापानासाठी निमंत्रित करीत असून त्यांच्याशी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने चर्चा करीत आहेत. सरकारने राबविलेल्या योजनांची खासदारांनी माहिती ठेवून जनतेपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना मोदी आपल्या खासदारांना करीत आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धात पंतप्रधान मोदी गेल्या काही दिवसांपासून सकाळी भाजपच्या विविध राज्यांतील खासदारांना गटागटांनी चहापानासाठी निमंत्रित करीत असून त्यांच्याशी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने चर्चा करीत आहेत. सरकारने राबविलेल्या योजनांची खासदारांनी माहिती ठेवून जनतेपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना मोदी आपल्या खासदारांना करीत आहेत.