अटारी: देशभरात ७१वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा होत असतानाच भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी-वाघा बॉर्डरवर 'बीटिंग रिट्रीट' सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी दोन्ही देशाच्या जवानांनी थक्क करणाऱ्या चित्तथरारक कवायती केल्या. तेव्हा सीमेवर जमलेल्या हजारो भारतीयांनी 'जय हिंद' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. बीटिंग रिट्रीट सोहळ्या दरम्यान जवानांसह दोन्ही देशांतील नागरिकांमधील जोश आणि जल्लोष पाह्यला मिळाला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दुपारपासूनच हजारो नागरिकांनी बीटिंग रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी वाघा बॉर्डरवर गर्दी केली होती. संध्याकाळी या ठिकाणी दोन्ही देशातील जवानांच्या परेड सुरू झाल्या. यावेळी बीएसएफचे अनेक बडे अधिकारी अटारी सीमेवर तयार करण्यात आलेल्या गेटवर पोहोचले होते. या सोहळया दरम्यान बीएसएफ जवानांनी कवायती करताना आपल्या शौर्याची झलक दाखवली. बीएसएफच्या महिला सैनिकांनीही आपल्या शौर्य आणि धाडसाचे प्रात्यक्षिक दाखवले.
प्रजासत्ताक दिन: राजपथावर नेत्रदीपक संचलन
यावेळी अनेक कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. अनेकांनी देशभक्तीपर गीतं गात ठेकाही धरला. तर अनेक जण जवानांसोबतही ताल धरताना दिसले. लहान मुलांनीही जवानांसोबत सेल्फी काढले. बीटिंग रिट्रीटनंतर जवानांनी भारतीय ध्वजाच्या नियमानुसार तिरंग्याला सलामी दिली. तेव्हा 'भारत माता की जय', 'इन्कलाब जिंदाबाद' आणि 'जय हिंद'च्या घोषणाने अटारी-वाघा बॉर्डर दुमदुमून गेली. यावेळी दोन्ही देशातील नागरिकांसोबतच परदेशी पर्यटकांनीही मोठी गर्दी केली होती.
प्रजासत्ताक दिनी आसाममध्ये पाच ग्रेनेड हल्ले
प्रजासत्ताक दिनानिमित्त दुपारपासूनच हजारो नागरिकांनी बीटिंग रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी वाघा बॉर्डरवर गर्दी केली होती. संध्याकाळी या ठिकाणी दोन्ही देशातील जवानांच्या परेड सुरू झाल्या. यावेळी बीएसएफचे अनेक बडे अधिकारी अटारी सीमेवर तयार करण्यात आलेल्या गेटवर पोहोचले होते. या सोहळया दरम्यान बीएसएफ जवानांनी कवायती करताना आपल्या शौर्याची झलक दाखवली. बीएसएफच्या महिला सैनिकांनीही आपल्या शौर्य आणि धाडसाचे प्रात्यक्षिक दाखवले.
प्रजासत्ताक दिन: राजपथावर नेत्रदीपक संचलन
यावेळी अनेक कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. अनेकांनी देशभक्तीपर गीतं गात ठेकाही धरला. तर अनेक जण जवानांसोबतही ताल धरताना दिसले. लहान मुलांनीही जवानांसोबत सेल्फी काढले. बीटिंग रिट्रीटनंतर जवानांनी भारतीय ध्वजाच्या नियमानुसार तिरंग्याला सलामी दिली. तेव्हा 'भारत माता की जय', 'इन्कलाब जिंदाबाद' आणि 'जय हिंद'च्या घोषणाने अटारी-वाघा बॉर्डर दुमदुमून गेली. यावेळी दोन्ही देशातील नागरिकांसोबतच परदेशी पर्यटकांनीही मोठी गर्दी केली होती.
प्रजासत्ताक दिनी आसाममध्ये पाच ग्रेनेड हल्ले