अ‍ॅपशहर

वीणा आणि भगवद्गीता; कलाम यांच्या पुतळ्यावरून वाद

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या कलाम स्मारकातील कलाम यांच्या मूर्तीसमोर भगवद्गीतेचे श्लोक कोरल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी कलाम यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरम येथे कलाम स्मारकाचे उद्घाटन केले.

Maharashtra Times 30 Jul 2017, 7:49 pm
मटा ऑनलाइन वृत्त। चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhagavad gita engraved near the statue of abdul kalam sparks controversy
वीणा आणि भगवद्गीता; कलाम यांच्या पुतळ्यावरून वाद


भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या कलाम स्मारकातील कलाम यांच्या पुतळ्यासमोर भगवद्गीतेचे श्लोक कोरल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी कलाम यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरम येथे कलाम स्मारकाचे उद्घाटन केले.

स्मारकात कलाम यांचा वीणाधारी पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या आसपास भगवद्गीतेचे श्लोक कोरण्यात आले आहेत. याचा 'डीएमके'सह अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. कलाम यांचे कुटुंबीय देखील या प्रकारामुळे नाराज झाले आहेत. कलाम यांच्या पुतळ्याशेजारी सर्वच धर्मांची वचने असायला हवी होती असे कलाम यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

#TNExclusive: A.P. J. Abdul Kalam’s family upset over #KalamControversy, says 'place text of all religions' #KalamControversy pic.twitter.com/kfkY6ghpC9 — TIMES NOW (@TimesNow) July 30,   2017 कलाम यांच्या पुतळ्याशेजारी भगवद्गीतेचे श्लोक कोरणे म्हणजे जातीयवाद लादण्यासारखेच आहे अशी प्रतिक्रिया 'डीएमके'चे नेता स्टालीन यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे. कलाम यांच्या पुतळ्याशेजारी तिरुक्करल ( तामिळ महान ग्रंथ) या ग्रंथातील ओळी का कोरल्या नाहीत असा सवालही स्टालीन यांनी उपस्थित केला आहे. कलाम यांच्या पुतळ्याशेजारी भगवद्गीतेचे श्लोक कोरून कलाम यांना हिंदू धर्माचा महान ग्रंथप्रेमी अशा रुपात सादर करण्याचा हा प्रयत्न तर नव्हे ना, असे मत 'व्हिसीके'चे नेता तिरुमवलन यांनी व्यक्त केले आहे. या प्रकारामुळे मुस्लिमांचाही अपमान झाला आहे, हे इथून हटवले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भगवद्गीता हा ग्रंथ तिरुक्करलपेक्षा अधिक महान आहे का?, असा थेट सवाल 'एमडीएमके'चे नेता वायको यांनी उपस्थित केला आहे. कलाम यांनी स्वत: ग्रीसच्या संसदेत संबोधित करताना तिरुक्करल ग्रंथातीलच काही ओळी म्हटल्या होत्या. त्यांनी या ग्रंथामधूनच "प्रत्येक देश हा माझा देश आहे, आणि सर्व लोक माझे नातेवाईक आहेत', अशा ओळी म्हटल्या होत्या. मात्र असे प्रकार करून भाजप काय करू इच्छिते हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे असेही वायको यांनी म्हटले आहे.

कुणी कितीही प्रयत्न केले, तरी लोकांच्या मनातील द्रविड आंदोलनाचा ठसा मिटवला जाऊ शकणार नाही, असेही वायको पुढे म्हणाले. आणखी एक नेते धहलान बकवी यांनीही या वादात उडी घेतली आहे. कलाम यांच्या पुतळ्याजवळून भगवद्गीतेचे श्लोक असलेला भाग काढून टाकण्यात यावा अशी मागणी बकवी यांनी केली आहे. 'या प्रकारावरून असे वाटते की कलाम हे संघ परिवाराचे समर्थकच होते. मात्र कलाम हे सर्वच धर्मांचा सारखाच आदर करत होते', असेही बकवी यांनी म्हटले आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज