अ‍ॅपशहर

दिल्लीतील पराभवानंतर 'आप'मध्ये बंडाचे वारे

दिल्ली महापालिका निवडणुकीत सपशेल पराभव होत असल्याचं दिसताच आम आदमी पक्षामध्ये बंडाचं वारं वाहू लागलं आहे. 'आप'चे पंजाबमधील खासदार भगवंत मान यांनी पक्ष नेतृत्वालाच या पराभवासाठी जबाबदार धरलं आहे. 'निवडणुकीच्या आधी आमच्या नेत्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा पक्षाला फटका बसला आहे,' अशी तोफ त्यांनी डागली आहे.

Maharashtra Times 26 Apr 2017, 12:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhagwant mann slams aap leadership for delhi debacle
दिल्लीतील पराभवानंतर 'आप'मध्ये बंडाचे वारे


दिल्ली महापालिका निवडणुकीत सपशेल पराभव होत असल्याचं दिसताच आम आदमी पक्षामध्ये बंडाचं वारं वाहू लागलं आहे. 'आप'चे पंजाबमधील खासदार भगवंत मान यांनी पक्ष नेतृत्वालाच या पराभवासाठी जबाबदार धरलं आहे. 'निवडणुकीच्या आधी आमच्या नेत्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा पक्षाला फटका बसला आहे,' अशी तोफ त्यांनी डागली आहे.

'द ट्रिब्यून'ला दिलेल्या मुलाखतीत मान यांनी स्वत:च्याच पक्षाला आरसा दाखवला. 'या निवडणुकांसाठी रणनीती आखताना पक्ष नेतृत्वानं ऐतिहासिक चुका केल्या. त्यामुळं आता इव्हीएममध्ये त्रुटी काढून काही फायदा नाही. आपला पराभव का झाला याचा विचार अंतर्मुख होऊन करायला हवा,' असं मान म्हणाले. 'तूर्त मी पक्षकार्यातून रजा घेतली आहे. माझ्या मुलांना भेटण्यासाठी अमेरिकेत जायची तयारी करतोय. मे महिन्यात भारतात परतल्यानंतर पुढील वाटचालींची दिशा स्पष्ट करेल,' असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

दिल्लीतील पराभवाच्या निमित्तानं मान यांनी पंजाबमध्ये 'आप'नं केलेल्या चुकांचाही पाढा वाचला. 'पंजाबमध्ये पक्षाला कॅप्टनशिवाय मैदानात उतरवण्यात आलं होतं. एखाद्या गल्लीतील क्रिकेट टीमप्रमाणं आम्ही पंजाबची निवडणूक लढवली. कुठल्या क्रमांकावर बॅटिंग करायची? बॉलिंग कधी टाकायची आणि फिल्डिंग कुठं करायची? हे प्रत्येक खेळाडू स्वत:चं ठरवत होता. केजरीवालांना मी स्वत: याबद्दल सांगितलं होतं,' असंही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज