अ‍ॅपशहर

जातनिहाय जनगणना, ईव्हीएमवर बंदीसाठी उद्या भारत बंद, 'या' संघटनेचं आवाहन

Bharat Bandh Today: जातनिहाय जनगणना, निवडणुकांमधील ईव्हीएमचावापर बंद करावा या मागणीसाठी २५ मे रोजी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. भारत बंदचं आवाहन बामसेफ या संघटनेकडून करण्यात आलं आहे.

Authored byयुवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2022, 12:56 pm
नवी दिल्ली : ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनोरिटी कम्युनिटीज एम्पॉलाइज फेडरेशनच्यावतीनं उद्या भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. ओबीसी प्रवर्गासाठी महत्त्वाचा मुद्दा असलेला जातनिहाय जनगणना आणि खासगी उद्योगांमधील आरक्षणाच्या मागणीसाठी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bharat Bandh
भारत बंद प्रातिनिधीक फोटो


बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फ्रंटच्यावतीनं भारत बंदचं आवाहन करण्यात आल्याचं सांगितलं आहे. नॅशनल परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांकडून भारत बंदला पाठिंबा देण्यात आल्याचं वामन मेश्राम यांनी सांगितलं आहे.भारत बंदमध्ये ओबीसी समुदायानं सहभागी होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात येत असल्याचं देखील वामन मेश्राम म्हणाले.

भारतीय युवा मोर्चानं भारत बंद का पुकारला?
निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करु नये, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, खासगी क्षेत्रात एसी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षण, शेतकऱ्यांना एमएसपी देण्यात यावी, एनआरसी, सीएए आणि एनपीआर लागू करु नये, जुनी पेन्शन योजना लागू करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ, आदिवासींना संरक्षण, करोना प्रतिबंधक लस वैकल्पिक करणे, कामगार कायद्यांतील बदलांना विरोध या मुद्यांसाठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

तीन वेळा नगरसेवक, लढाऊ कार्यकर्ता, कट्टर सैनिक, मातोश्रीचा हात डोक्यावर असलेले संजय पवार

भारत बंदला बहुजन मुक्ती पार्टीकडून समर्थन देण्यात आलं आहे. नागरिकांनी भारत बंद यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न करावेत, असं डी.पी. सिंग म्हणाले. सोशल मीडियावरुन भारत बंदसंदर्भात आवाहन करण्यात आलं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि उद्योग बंद ठेवावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Sanjay Pawar : शिवसेनेकडून सहाव्या जागेचा चाप्टर क्लोज, संजय पवार यांचं नाव फायनल
भारत बंदला कशा प्रकारे प्रतिसाद मिळणार?
बामसेफकडून भारत बंदचं आवाहन करण्यात आलं असलं तरी या बंदला कशा प्रकारे पाठिंबा मिळणार हे पाहावं लागणार आहे. भारत बंदचा प्रभाव किती प्रमाणात जाणवतो हे देखील पाहावं लागेल.
लेखकाबद्दल
युवराज जाधव
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम... आणखी वाचा

महत्वाचे लेख