मेरठ: सोशल मीडियावरून आरक्षणाविरोधात पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'ला बिहारमध्ये हिंसक वळण लागले आहे. बिहारच्या आरामध्ये दोन गटांत प्रचंड हाणामारी झाली असून दोन्हीकडून गोळीबार करण्यात येत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय आरामध्ये आंदोलकांनी आरक्षणाविरोधात घोषणाबाजी देत रेल रोको केल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे बिहारवगळता इतर राज्यात या बंदला थंड प्रतिसाद मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटीबाबत दिलेल्या निर्णयानंतर २ एप्रिल रोजी 'भारत बंद' पुकारण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काही संघटनांनी सोशल मीडियावरून आरक्षणाविरोधात आज 'भारत बंद'ची हाक दिली. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही भागात तरुणांनी रेल रोको करत निदर्शने केल्याने या भागांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागांमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजस्थान, केरळ आणि मध्यप्रदेशात बंदच्या पार्श्वभूमीवर प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तुरळक घटना वगळता या भागात बंदला फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बिहारमध्ये तरूण रुळावर
बिहारच्या आरामधील आनंदनगर परिसरात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूने एकमेकांवर गोळीबार करण्यात आला आहे. शेकडो तरुणांनी रेल्वे रुळावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत पटना पॅसेंजर ट्रेन रोखून धरली. त्यामुळे पटना-कोलकाता मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक लोक रेल्वे रुळावर बसून आंदोलन करत आहेत. आरामध्ये तणावाची स्थिती असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून अनेक शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
भोजपूर, रतवार, भगवानपूर आणि नवादा येथे सकाळपासून रास्ता रोको करण्यात आला आहे. मुझफ्फरपूरमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर उतरून टायर जाळून निषेध नोंदविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्येच आहे. त्यामुळे बिहारमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात इंटरनेट बंद
'भारत बंद'चा सर्वाधिक परिणाम उत्तर प्रदेशात जाणवत आहे. मेरठ, सहारनपूर आणि मुझफ्फरनगर येथे रविवारी सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. हिंसेच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश मिळेपर्यंत सहारनपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. हापूड आणि मुझफ्फरनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. फिरोजाबाद आणि मुझफ्फरनगरमध्ये सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मध्यप्रदेशात संचारबंदी आणि जमावबंदी
'भारत बंद'च्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील अनेक शहरात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. भिंड, मुरैना, श्योपूर, शिवपुरीमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली असून भिंड आणि मुरैनामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पॅरामिलिट्री फोर्सच्या ६ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एकट्या ग्वाल्हेरमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सागरमध्ये निदर्शने करणे आणि रॅली काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राजस्थानमध्येही संचारबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटीबाबत दिलेल्या निर्णयानंतर २ एप्रिल रोजी 'भारत बंद' पुकारण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काही संघटनांनी सोशल मीडियावरून आरक्षणाविरोधात आज 'भारत बंद'ची हाक दिली. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही भागात तरुणांनी रेल रोको करत निदर्शने केल्याने या भागांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागांमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजस्थान, केरळ आणि मध्यप्रदेशात बंदच्या पार्श्वभूमीवर प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तुरळक घटना वगळता या भागात बंदला फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
बिहारमध्ये तरूण रुळावर
बिहारच्या आरामधील आनंदनगर परिसरात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूने एकमेकांवर गोळीबार करण्यात आला आहे. शेकडो तरुणांनी रेल्वे रुळावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत पटना पॅसेंजर ट्रेन रोखून धरली. त्यामुळे पटना-कोलकाता मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. अनेक लोक रेल्वे रुळावर बसून आंदोलन करत आहेत. आरामध्ये तणावाची स्थिती असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून अनेक शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
भोजपूर, रतवार, भगवानपूर आणि नवादा येथे सकाळपासून रास्ता रोको करण्यात आला आहे. मुझफ्फरपूरमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर उतरून टायर जाळून निषेध नोंदविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्येच आहे. त्यामुळे बिहारमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात इंटरनेट बंद
'भारत बंद'चा सर्वाधिक परिणाम उत्तर प्रदेशात जाणवत आहे. मेरठ, सहारनपूर आणि मुझफ्फरनगर येथे रविवारी सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. हिंसेच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश मिळेपर्यंत सहारनपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. हापूड आणि मुझफ्फरनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. फिरोजाबाद आणि मुझफ्फरनगरमध्ये सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मध्यप्रदेशात संचारबंदी आणि जमावबंदी
'भारत बंद'च्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील अनेक शहरात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. भिंड, मुरैना, श्योपूर, शिवपुरीमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली असून भिंड आणि मुरैनामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पॅरामिलिट्री फोर्सच्या ६ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एकट्या ग्वाल्हेरमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सागरमध्ये निदर्शने करणे आणि रॅली काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राजस्थानमध्येही संचारबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.